स्वच्छता कर्मचाऱयांचे कामबंद आंदोलन :
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची बदली मुख्य कार्यालयात करण्यात आल्याने अन्य स्वच्छता निरीक्षकांकडे रामलिंगखिंड गल्ली परिसरासह विविध भागाच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, हा स्वच्छता निरीक्षक त्रास देत असल्याचा आरोप करून बुधवारी स्वच्छता कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन केले. तसेच याबाबतची तक्रार येथील माजी नगरसेविका सरिता पाटील यांच्याकडे करून पूर्वीच्या स्वच्छता निरीक्षकालाच नियुक्त करावे, अशी मागणी केली.
रामलिंग खिंड गल्लीसह विविध परिसराच्या स्वच्छतेचे कामकाज पाहण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक बाबू माळन्नावर यांच्याकडे सोपविली होती. पण त्यांना बढती मिळाली असून मुख्य कार्यालयात बदली झाली आहे. त्यामुळे या परिसराच्या स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक आदिवासी यांच्याकडे सोपविली आहे. पण त्यांनी कारभार स्वीकारल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱयांवर विविध जबाबदाऱया दिल्या आहेत. तसेच कामकाजात बदल करून सुपरवायझरला देखील स्वच्छतेचे काम करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कामकाजात व्यत्यय निर्माण होत आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर चारच दिवसात स्वच्छता कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱयांनी बुधवारी काही वेळासाठी कामकाज बंद ठेवून आंदोलन छेडले. तसेच याबाबतची तक्रार परिसराच्या माजी नगरसेविका माजी महापौर सरिता पाटील यांच्याकडे केली. या परिसराची जबाबदारी यापूर्वीचे स्वच्छता निरीक्षक बाबू माळन्नावर यांच्याकडेच सोपवावी, अशी मागणी स्वच्छता कामगारांनी केली. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी विनंतीही कामगारांनी सरिता पाटील यांच्याकडे केली.
त्यामुळे माजी महापौर सरिता पाटील यांनी पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिल खान पठाण यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. तसेच कामगारांच्या मागणीची माहिती देऊन याकडे लक्ष देण्याची सूचना केली. वरि÷ अधिकारी चित्तवाडगी यांना माहिती देण्यात येईल, असे खान पठाण यांनी यावेळी सांगितले.