पुन्हा एकदा रस्ते झाले सुनेसुने : ठराविक वेळेत किरकोळ विक्री, मागील लॉकडाऊनची आठवण पुन्हा आली समोर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. पहिल्या लाटेमध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण शहरात तसेच तालुक्मयात शुकशुकाट पसरला तशीच अवस्था आताही काही प्रमाणात बाजारपेठेची झाली आहे. बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांतच दुकाने काही प्रमाणात उघडी ठेवण्यात येत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा बेळगावातील बाजारपेठ कधी फुलणार असेच साऱयांना वाटू लागले आहे. बेळगावसह देशातील कोरोनाचे संकट जावो आणि पुन्हा एकदा आपण पूर्वीप्रमाणेच बाजारपेठेत मनमोकळेपणाने फिरू आणि खरेदी करू, असे अनेकांना वाटू लागले आहे.
क्लोजडाऊनमुळे अजूनही अनेक दिवस शहराची बाजारपेठ पूर्णतः कार्यरत राहील याची शाश्वती नाही. जोपर्यंत कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव शांत होत नाही तोपर्यंत आता अशीच परिस्थिती शहर आणि परिसरात दिसून येत आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये 43 दिवसांनंतर काही दिवसांसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठेत नेहमीच गर्दी दिसली. बेळगाव बाजारपेठेत म्हणजेच नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, झेंडा चौका, कांदा मार्केट येथे सातत्याने गर्दी दिसत असते. मात्र, क्लोजडाऊनमध्येही काही प्रमाणात सकाळच्या सत्रात गर्दी होत असली तरी दिवसभर मात्र शांतता पसरली आहे.
प्रदीर्घ काळाचे लॉकडाऊन आणि समोरच येऊन ठेपलेला पावसाळा या पार्श्वभूमीवर सध्या धान्य-साहित्याची बेजमी करून ठेवण्यात प्रत्येक जण गर्क आहे. त्यामुळेच सारेजण घराबाहेर पडतात. मात्र जर आपणच बेफिकीरपणा दाखवला तर दुसऱया लाटेने मोठे नुकसान होणार यात शंका नाही. बेळगावत मागील आठवडाभरापासून कोरोनाने 500 हून अधिक दररोज रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जर पूर्वीप्रमाणेच बाजारपेठ फुलवायची असेल तर सर्वांनी आता घरी बसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सकाळी 6 ते 10 पासूनच बाजारपेठेत गर्दी होत आहे. पुन्हा मिरची बाजाराला चांगले दिवस आले होते. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने क्लोजडाऊनचा पर्याय ठेवला आहे. परिणामी बाजारपेठेची वेळ ठरवून दिली असली तरी वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरत आहे. धान्य बाजारपेठेप्रमाणेच फळ बाजाराला बहर आला होता. सध्या बाजारपेठे सर्वत्र कलिंगड, अन्नस, आंबे, केळी यांची आवक वाढलेली दिसत होती. या शिवाय सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी बसत होती. मात्र, वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरत असल्याने पुन्हा क्लोजडाऊन करण्यात आले होते.
आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकारी नियम पाळून पुन्हा एकदा त्याला हद्दपार करण्यासाठी एकत्र लढा देणेही गरजेचे आहे. पुन्हा एकदा बाजारपेठ बहरण्यासाठी सर्वांनी मिळून कोरोना थोपविण्यासाठी नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणेच बाजारपेठेत मुक्तांगणाने खरेदी विक्री करू.