ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशनात झालेल्या प्रचंढ गोंधळावर सरन्यायाधीस एन.व्ही. रमण यांनी परखड शब्दांत आपले मत व्यक्त केले असून, पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट आहे. असे आपले मत व्यक्त केले व संसदेतील गोंधळाच्या स्थिती बद्दल आपली नाराजी व्यक्त केली.
संसदेतील गोंधळावरुन सातत्याने सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येतो आहे. त्याचा थेट परिणाम संसदेच्या कामकाजावर होत आहे. याबद्दल देशभर चर्चा ही सूरु आहेत. याच स्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवत सरन्याधीश रमण यांनी आपला आक्षेप नोंदवला. सताधारी विरोधकांकडे बोट करताहेत तर विरोधक सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. आज संसदेमध्ये किंवा लोकप्रतिनिधींच्या सभागृहामध्ये होत असलेल्या चर्चांची वाईट परिस्थिती आहे, अशा शब्दांत न्यायमूर्ती रमण यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना सुनावले आहे.
आता कायद्यांमध्ये ही अनेक खाचा-खोचा असतात. कायद्यांमध्ये खूप संदिग्धता असते. कायद्यांमध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे आम्हालाच माहिती नाही की कोणत्या कारणासाठी कायदा करण्यात आलाय. यामुळे सरकारचं देखील नुकसान होतं आणि जनतेलाही मनस्ताप सहन करावा लागतो. जेव्हा बुद्धिवादी आणि वकिलांसारख्या व्यवसायातील लोक सभागृहांमध्ये नसतात तेव्हा हे घडतं”, अशा शब्दांत रमण यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे.