प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थीवर्गाचे हाल होत आहेत. तालुक्मयाच्या पूर्व भागात बससेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा-महाविद्यालये पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत बसफेऱया कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिवहनने तातडीने पूर्व भागात बसफेऱया वाढवाव्यात, अशा मागणीचे निवेदन पूर्व भागातील नागरिकांनी विभागीय अधिकारी के. के. लमाणी यांना दिले.
ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थीवर्गाचे हाल होत आहेत. दरम्यान बसपास असूनही खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत आहे. पूर्व भागातील मोदगा, सुळेभावी, मारिहाळ, पंत बाळेकुंद्री, मुतगा, सांबरा आदी भागातील बसफेऱया कमी झाल्या आहेत. या भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगावला येत असतात. मात्र अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. बसफेऱया कमी झाल्याने काही बस मूळ ठिकाणाहूनच भरून येत आहेत. त्यामुळे त्या बसथांब्यावर न थांबताच परस्पर पुढे जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
सुळेभावी येथूनच बस भरून येत असल्याने पुढील बसथांब्यांवर बस न थांबताच धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास असूनही वडापचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पूर्व भागातील बससेवा नियमित आणि पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी जि. पं. माजी सदस्य नागेश देसाई, भालचंद्र पाटील, शाम मोदगेकर, किरण पाटील, नारायण कणबरकर, सुधीर पाटील यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.