ऑनलाईन टीम / लेह :
पूर्व लडाखमधील कडाक्याची थंडी चिनी सैन्य सहन करू शकत नाहीत. त्यांना दररोज आपल्या सैन्याची जागा रोटेशन पद्धतीने बदलावी लागत आहे. त्यामुळे नेहमीच आक्रमकपणा दाखवणारा चीन हवामानासमोर मात्र हार मानत आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेले भारतीय सैनिक चिनी सैन्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावत आहेत. त्यांना तेथील सेवेचा अनुभव आहे. त्यामुळे ते थंडीचा सामना करू शकतात. मात्र, चिनी सैन्याला या कडाक्याच्या थंडीमुळे दररोज आपल्या सैन्याची जागा बदलावी लागत आहे.
दरम्यान, या वर्षी एप्रिल-मे महिन्यात चीनने पूर्व लडाखमध्ये भारतीय सीमेसाठी जवळपास 60 हजार सैनिक आक्रमकपणे तैनात केले होते. रणगाड्यांसह आणि प्रचंड सशस्त्र सैनिकांसह चीनला भारतीय हद्दीत घुसून ते ताब्यात घ्यायचे होते. मात्र, भारतानेही लष्करी तैनाती वाढवून चीनचे मनसुबे उधळून लावले.