प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वर्षी झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नाल्यावरील अतिक्रमण आणि नाल्याची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे यंदा नाले स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. मात्र पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनावर विसंबून न राहता नागरीकांनी देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पावसामुळे दरवषी विविध परिसरात नाल्याचे पाणी शिरते. विशेषत: कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, हुलबत्ते कॉलनी, गांधीनगर, इंद्रप्रस्थ नगर आणि नानावाडी आदी ठिकाणी नेहमीच पावसाळय़ात पाणी साचून राहते. पण ही समस्या निवारण करण्यासाठी प्रशासनाने आजवर आवश्यक उपाय योजना राबविल्या नव्हत्या. मात्र काही ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करून तसेच नाल्याची स्वच्छता करून पूर परिस्थिती निर्माण होऊनये याची खबरदारी महापालिका प्रशासनाने घेतली होती. तरी देखील मागीलवषी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील विविध भागात पाणी साचले. नाला काठावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले होते. नाल्याचे बांधकाम करूनही वरील भागात पाणी साचले होते. पण मागील वषी इतका पाऊस होता. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत नव्हते अशा ठिकाणी देखील रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे मागील वर्षिच्या पावसाने इतिहास घडविला होता. संततधार झालेल्या पावसामुळे काँग्रेस रोडची उंची वाढवूनही रस्त्यावर पाणी साचले होते. इंद्रप्रस्थ नगर आणि गोवावेस येथील खानापूर रोडवर नाल्याचे पाणी आले होते. नानावाडी, मराठा कॉलनी, शांती कॉलनी, मण्यार लेआऊट, एम. जी. कॉलनी, समर्थ नगर, शिवाजी नगर, विरभद्र नगर, गुडशेड रोड अशा भागात पाणी साचल्याने येथील रस्ते आठ दिवस पाण्याखाली होते. तसेच काही इमारतींच्या बेसमेंटमध्ये तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे मोठय़ा प्रमाणात नूकसान झाले होते. नाला स्वच्छता मोहीम व्यवस्थित राबविण्यात आली नाही. तसेच नाल्यावरील अतिक्रमणामुळे शहरवासीयांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. निर्माण झालेल्या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला. झालेल्या नुकसानीला महापालिकाच कारणीभूत आहे. अशी टीकाटीप्पणी देखील झाली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. शक्मय तितकी अतिक्रमणे हटवून नाला रूंद करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पाण्याचा निचरा होण्यास अडथळे असलेल्या ठिकाणाच्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. नाल्याच्या ठिकाणी पुलापाशी असलेल्या विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या मोबाईल केबल्स आदी अडथळे बाजुला सारून पाणी निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. टिळकवाडी भागातील तसेच समर्थनगर येथील व महत्वाच्या नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे यंदा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही अशी अपेक्षा महापालिकेच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. पण महापालिकेच्या कार्यवाहीवर नागरीकांनी कितपत विसंबून राहणे याचा विचार करण्याची वेळ निर्माण झाली आहे. एरवी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास 24 तासाच्या आत पाण्याचा निचरा होऊन रस्ते मोकळे होत असत. मात्र मागील वषी सातत्याने झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी कमी झाले नाही. काही ठिकाणाचे रस्ते देखील वाहून गेले. तसेच शहरात ठिकठिकाणी जुन्या घरांची पडझड देखील झाली. निसर्गाने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे प्रशासन देखील हतबल झाले. त्यामुळे प्रशासनावर विसंबून राहणे कितपत योग्य आहे. असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पूर परिस्थिती निवारणासाठी शासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी देखील खबरदारीच्या उपाय योजना राबविणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून पूरपरिस्थितीपासुन बचाव करण्यासाठी योग्य नियोजन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. पावसामुळे तळघरात पाणी शिरल्याने विद्युत पुरवठय़ाचे मिटर खराब झाले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी शॉर्ट सर्किटसारख्या अप्रिय घटनांमुळे काहींना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी विद्युत मिटर बेसमेंटमधुन स्थलांतर करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी तळघरातील विद्युत मिटर आणि विद्युत ट्रान्सफॉर्मर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून घेणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाकडून मदत मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सतत पाणी साचून राहणाऱया परिसरातील नागरीकांनी शक्मय असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे गरजेचे आहे. तसेच पावसाळय़ापूर्वी किंवा पावसाचा जोर वाढल्यास घरात पाणी शिरणाऱया ठिकाणाचे किंमती साहित्य किंवा दैनंदिन उपयोगी साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी नागरीकांची आहे. तसेच नाल्यात कचरा टाकल्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नाल्यात कचरा टाकण्याचे टाळणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नाल्याची स्वच्छता झाली नसल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा आहे. याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांना देऊन नाला स्वच्छ करून घेणे ही जबाबदारी देखील नागरीकांची आहे. त्यामुळे केवळ महापालिका आणि महापालिकेंच्या अधिकाऱयांवर विसंबून न राहता पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी शहरातील नागरीकांनी देखील सज्ज राहणे आवश्यक आहे.