जिल्हाधिकाऱयांनी घेतली तातडीने बैठक, अधिकाऱयांना केल्या सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
पूर परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रयत्न करा, कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये याची दक्षता घ्या, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱयांना केली आहे. लोकांना पावसाची माहिती द्यावी तसेच खबरदारीबाबत उपाय योजना करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहेत. नदीकाठावरील गावांतील लोकांना खबरदारी घेण्याबाबत त्यांना पावसाची तसेच महाराष्ट्र व इतर ठिकाणांहून येणाऱया पाण्याची माहिती वेळोवेळी देण्यात यावी. तसेच अधिक पाऊस झाल्यानंतर गावामध्ये पाणी शिरत असेल तर तातडीने ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात यावे, असेही सांगण्यात आले.
अधिक पाऊस झाल्यानंतर मच्छीमारांनाही नद्यांमध्ये जाण्यापासून रोखावे, अशी सक्त ताकीद दिली आहे. एकूणच पुरासंदर्भात अधिकाऱयांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या आणि सावधानतेने काम करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
पाऊस वाढला तसेच पुराची परिस्थिती निर्माण झाली तर 24 तास काम करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. यासाठी यापूर्वीच नोडल अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अधिक कर्मचारी उपलब्ध करण्याच्यादृष्टिने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
एनडीआरएफ पथक
एनडीआरएफ पथक आताच तैनात करण्यात आले आहे. पुरामुळे होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्थलांतरित केलेल्या नागरिकांना औषधे तसेच अन्नपाणी याची कमतरता पडू नये याकडे अधिक लक्ष द्यावे, असे देखील सांगण्यात आले.
णुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जिल्हय़ामध्ये 9 जुलै ते 15 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.