प्रतिनिधी/ सातारा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये धमक आहे. त्यांच्याच सहीने बारामतीच्या मेडिकल कॉलेजला मंजूरी मिळाली होती. साताऱयाच्या मेडिकल कॉलेजला मंजूरी त्यावेळी त्यांनी दिली होती. परंतु त्यावेळी जिह्याचे पालकमंत्री आणि कृष्णा खोऱयाचे मंत्री कोण होते. कोणी जागा द्यायला विरोध केला होता ते तपासा अगोदर अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीप्पणीला प्रतिउत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिले. दरम्यान, काँग्रेस उद्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ऍड.विजयराव कणसे, रजनी पवार, अन्वरपाशा खान, नरेश देसाई, ऍड. दत्तात्रय धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सक्षम आहेत. त्यांच्याच सहीने साताऱयाचे आणि बारामतीचे मेंडिकल कॉलेज मंजूर झाले. त्यावेळी सातारा जिह्याचे पालकमंत्री व कृष्णा खोऱयाचे मंत्री कोण होते हे तपासा, कृष्णा खोऱयाची जागा द्यायला कोणी विरोध केला हे पहा. बाबांच्यात धमक आहे. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत. 108 रुग्णवाहिका जी धावते ती कोणी सुरु केली तर बाबांनी, अशा शब्दात त्यांनी काल अजितदादांनी केलेल्या वकत्व्याला प्रतिउत्तर दिले. पुढे ते म्हणाले, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या बंदमध्ये काँग्रेस सहभागी होणार आहे. भाजपा सरकार गेली सात वर्षे खोटी आश्वासने देवून सत्तेत बसलेले आहे. हुकूमाशाही करत आहे. शेतकऱयांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत. ते रद्द करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांना कसा त्रास होईल हे मोदी सरकार काम करत आहे. मोदी सरकारने नोकऱया देण्याचे आश्वासन दिले होते. कुठे आहे सरकारी नोकरी. महागाई वाढली आहे. शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महागाई विरोधात उद्या देश व्यापी बंद आहे. त्या बंदमध्ये सहभागी होत आहे असे त्यांनी सांगितले.
सातारा नगरपालिका काँग्रेस लढवणार
सातारा पालिका ही काँगsिस स्वतंत्रपणे लढवणार असूनक वरीष्ठांनी आग्रह धरला आहे. चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. 7 ते आठ काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, जिल्हा बँकेसाठी 4 जागा मागितल्या आहेत. त्या नाही दिल्या तर जिल्हा बँकेच्या आम्ही सर्व्हे केला आहे काँगेसला सन्मानाने चार जागा मागितल्या आहेत. त्यांनी नाही दिल्या तर माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शंभूराज देसाई यांची बैठक झाली आहे. त्यानुसार निवणुकीबाबत निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.