ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय महिला नेमबाज अवनी लेखराने एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकून इतिहास रचला. आज झालेल्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशन स्पर्धेत अवनीने कांस्य पदकाची कमाई केली. सोमवारी तिने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
अवनी लेखराने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन एसएच 1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. अंतिम फेरीत 445.9 गुणांसह ती तिसऱया स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्मयूपिंगने 457.9 गुणांसह सुवर्ण तर जर्मनीच्या हिलट्रॉप नताशाने 457.1 गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य अशी 12 पदके आली आहेत.