प्रतिनिधी /पणजी
सर्व शिक्षक अभियानांतर्गत काम करणाऱया अर्धवेळ शिक्षकांनी (पॅरा टिचर) नोकरीत कायम करा, अशी मागणी करीत पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने केली तर स्वातंत्र्यसैनिक मुलांच्या संघटनेतर्फे नोकऱया देण्याची मागणी करून त्यांनीही तेथेच निदर्शने करत आंदोलन केले.
अर्धवेळ शिक्षकांनी शिक्षणमंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांना निवेदन सादर केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात सामावून घेऊन नोकरीत कायम करा, अशी मागणी केली. त्यांनी आपापल्या मागण्यांचे फलक हाती धरले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी नोकरीच्या मागणीसाठी आझाद मैदानावर जमून निदर्शने केली. राज्य सरकारतर्फे आता सुमारे 10,000 सरकारी नोकऱयांची भरती केली जाणार आहे. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या 227 मुलांना अनुकंपा तत्वावर भरती करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. शिक्षक व स्वातंत्र्यसैनिकांची मुले अशा दोघांचेही आंदोलन आझाद मैदानावर झाले. अनेकांचे वय वाढलेले असून अद्याप त्यांना नोकरी नाही आणि नोकरी असलीतरी ती कायम नसल्याने भवितव्याचा प्रश्न सतावत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.