प्रतिनिधी/ रत्नागिरी
पॅरोलवर सुट्टीवरुन फरार झालेल्या आरोपीला तब्बल 7 वर्षानी जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आह़े रफिक शेख असे या आरोपीचे नाव आह़े सात वर्षे फरार असलेला रफिक शेख याच्या मुसक्या ठाणे, मुंब्रा परिसरातून आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आह़े
फैय्याज हकीम खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येऊन 7 वर्ष फरार झालेल्या रफिक अब्दुलरहेमान शेख (45, रा. पाटील वाडी, तेली आळी) याला न्यायालयाने 5 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रत्नागिरीतील धनजी नाका परिसरात 2007 साली फैय्याज हकीम या तरुणाचा खून झाला होता. या खूनातील आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले होते. या प्रकरणात काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. जन्मठेप झालेल्या आरोपींची रत्नागिरीच्या कारागृहातून नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होत़ी
कारागृहात शिक्षा भोगत असताना 23 जानेवारी 2012 रोजी रफिक पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल संपल्यानंतर त्याने पुन्हा 14 दिवसांसाठी वाढीव रजा मागीतली होत़ी ती मान्य करण्यात आली होत़ी 21 फेब्रुवारी 2012 रोजी त्याची रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता पॅरोलवर असलेला रफिक फरार झाल़ा 2012 साली फरार झालेल्या रफिक शेखला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. 12 जानेवारी 2014 रोजी रफिकवर पळून गेल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होत़ा सात वर्ष गायब झालेल्या रफिकचा शोध शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग घेत होता. मात्र तो सतत पोलिसांना गुंगारा देऊन आपला ठावठिकाणा वेळोवेळी बदलत होता.
शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली रफिकला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश येत तब्बल 7 वर्षे फरार असलेला रफिक शेख हा ठाणे- मुंब्रा परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी रफिकच्या मुसक्या आवळल्या. रफिक शेखविरोधात भादंविक 224 अन्वये गुन्हा दाखल होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने रफिकला 5 महिने कारावासाची शिक्षा सुनावली.