सर्वसामान्य प्रवाशांचे हाल
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊननंतर मे महिन्याच्या अखेरपासून नैर्त्रुत्य रेल्वे सुरू करण्यात आली असली तरी अद्याप पॅसेंजर रेल्वेचे इंजिन मात्र रुळावर येताना दिसत नाही. 9 महिने उलटले तरी पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱयांना सध्या अधिक पैसे खर्च करून बसचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे रुळावर केक्हा येणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मिरज ते हुबळी या मार्गावर यापूर्वी 6 ते 7 पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. परंतु या रेल्वे लॉकडाऊनपासून बंद आहेत. सरकारने परिवहन मंडळाला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली. मंदिरे, सिनेमागृहेही सुरू असताना पॅसेंजर रेल्वे बंद का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिरज ते हुबळी या मार्गावर दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असतानाही रेल्वे सुरू न करण्यामागचे कारण काय? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
बेळगाव शहरात नोकरी-व्यवसायासाठी अनेकजण जिल्हाभरातून येतात. लोंढा, कॅसलरॉक, अळणावर, खानापूर, घटप्रभा, गोकाक, रायबाग, कुडची, उगारखुर्द या परिसरातून व्यवसाय, शिक्षण, आरोग्य यासाठी नागरिक दाखल होत असतात. पॅसेंजर रेल्वेने अवघ्या 30 ते 40 रुपयांमध्ये पोहचणाऱया नागरिकांना आता 80 ते 100 रुपये खर्च करून बेळगावमध्ये यावे लागत आहे.
पॅसेंजरअभावी नोकऱया जाण्याची वेळ
बेळगावमध्ये येवून भाडेकरू म्हणून राहणे, खाणे सर्वसामान्यांना शक्मय नाही. बसचा प्रवास करणेही परवडणारे नसल्याने नोकरी सोडून देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रायबाग, कुडची, लोंढा, कॅसलरॉक येथील नोकरदारांना पॅसेंजरचाच आधार असल्याने याची दखल घेऊन पॅसेंजर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सिटीझन्स कौन्सिलकडून पाठपुरावा
कमी आर्थिक उत्पन्न असणाऱया प्रवाशांना प्रवासासाठी पॅसेंजर रेल्वे महत्त्वाची आहे. अत्यल्प तिकीट दरात पॅसेंजरमुळे प्रवास करणे सोयीचे ठरते. परंतु पॅसेंजर रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास खडतर झाला आहे. त्यामुळे बेळगावमधून पॅसेंजर सुरू करण्यासाठी सिटीझन्स कौन्सिल पुढे आले असून त्यांनी नैर्त्रुत्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांशी पत्रव्यवहार करून पॅसेंजर रेल्वेची मागणी करण्यात येत आहे.