ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेगासस हेरगिरी प्रकरणावर दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती एनवी रमना यांनी या सुनावणीसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहात पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरुन गदारोळ सुरू आहे. या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर तात्काळ सुनावणी करावी, अशी मागणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी मुख्य न्यायमुर्ती रमना यांच्याकडे केली. त्यावर न्या. रमना यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी करण्यास सहमती दर्शवली.