मुंबई
पेटीएमच्या समभागांच्या भावामध्ये 3 टक्के इतकी घसरण दिसून आली. बाजारात 728 रुपयासह कंपनीच्या समभागांनी नीच्चांकी स्तर गाठला होता. गेल्या वर्षभरामध्ये समभागाचा भाव 45 टक्के इतका घसरला आहे. कंपनीचे बाजार भांडवल बीएसईवर घटून 50 हजार कोटीवर आले आहे. याआधी या समभागाचा भाव 1961 रुपये इतका होता. सध्याला जवळपास समभागाच्या भावात 63 टक्क्यांची घसरण झालेली दिसते आहे.