सकाळी 8 पासून मतमोजणी : तीन टप्प्यात होणार मोजणी : जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर गेल्या मंगळवार दि. 22 रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आता मतमोजणीकडेच साऱयांचे लक्ष लागून होते. उद्या बुधवार दि. 30 रोजी मतमोजणी बी. के. मॉडेल स्कूल येथे होणार असून तीन टप्प्यामध्ये ही मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.
बेळगाव तालुक्मयातील 55 ग्राम पंचायतींची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीसाठी 2 लाख 57 हजार 64 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 964 जागांसाठी तब्बल 3 हजार 5 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आता मतमोजणीमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासांत समजणार आहे.
सकाळी 8 ते 11 या वेळेत बस्तवाड, होनगा, धरनट्टी, अंकलगी, कलखांब, बाळेकुंद्री खुर्द, कंग्राळी बी. के., कुदेमनी, मंडोळी, मुतगा, तुरमुरी, सुळगा (हिं.), मास्तमर्डी, अष्टे, हंदिगनूर, कुकडोळी, हिंडलगा, तुम्मरगुद्दी, अगसगा, हिरेबागेवाडी या ग्राम पंचायतींची मतमोजणी होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत संतिबस्तवाड, मुचंडी, हलगा, न्यू वंटमुरी, बंबरगा, निलजी, बेनकनहळ्ळी, बाळेकुंद्री बी. के., अरळीकट्टी, हुदली, उचगाव, कडोली, तारिहाळ, सांबरा या ग्राम पंचायतींची मतमोजणी होणार आहे.
दुपारी 2 ते सायंकाळी 5 पर्यंत येळ्ळूर, मारिहाळ, के. के. कोप्प, बेकिनकेरे, बेळगुंदी, देसूर, मोदगा, काकती, बडस खुर्द, सुळगा (ये.), कंग्राळी खुर्द, नंदिहळ्ळी, भेंडीगेरी, मुत्नाळ, मार्कंडेयनगर, धामणे (एस.), करडीगुद्दी, किणये या ग्राम पंचायतींची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
बी. के. मॉडेल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याच ठिकाणी पोलीस आयुक्त तसेच तहसीलदार कार्यालयही करण्यात आले आहे. या मतमोजणीसाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. पास असलेल्यांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे. या परिसरात कोणत्याही घोषणा देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
विजयोत्सव साजरा करण्यावर निर्बंध
विजयी झाल्यानंतर कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही. फटाके उडवायचे नाहीत. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करायची नाही. घोषणाबाजी करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही पत्रके काढून वाटायची नाहीत. कोणीही या प्रकारचे निर्बंध तोडले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. विजयानंतर पराभूत झालेल्या उमेदवाराला डिवचून बोलणे तसेच भांडणे काढण्याचे प्रकार घडल्यास विजयी उमेदवारावर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.