ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जेव्हापासून केंद्रात भाजप सरकार आले आहे, तेव्हापासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका करताना दिसत आहेत. मग तो महागाईचा मुद्दा असो वा बेरोजगारीचा. त्यातच आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढते दर या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरले आहे.
राहुल गांधी यांनी या बाबत एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे, जर एखाद्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही झाली तर ती मोठी बातमी होते.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सरकारला घेरले होते. याआधी त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, महामारी, महागाई, बेरोजगारी हे सर्व पाहून देखील पाळले आहे मौन जनता जाणून आहे की …याला जिम्मेदार कोण ? असा सवाल देखील उपस्थितीत केला होता.
दरम्यान, दररोज वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य जनता त्रासली आहे. अनेक मुंबई पुणे सह अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. आधीच कोरोनाचे संकट असताना वाढत्या महागाईमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे.