प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील पंचायतीच्या सर्व तलाठी कार्यलयात जातीचा व रहिवासी दाखला देण्यासाठी उशीर केला जातो. तलाठी कार्यलयामध्ये तलाठी एक किंवा दोन दिवस उपलब्ध असतात. काही कार्यलयामध्ये नेटवर्क मिळत नाही. काही तलाठी जातीचा दाखला देण्यासाठी लग्न झालेल्या मुलीच्या आईवडीलांचा उत्पन्नाचा दाखला मागतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी दाखला योग्य वेळी मिळत नाही. दाखला देण्यासाठी काही तलाठी समाज बांधवांना चुकीची माहिती देतात. उपजिल्हाधिकारी किंवा पेडणे मामलेतदार यानी त्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे सदर जातीचा किंवा रहिवासी दाखला पेडणे कार्यलयातून देणे व ओ.बी.सी. दाखल्यासाठी येणाऱया अडचणी दूर कराव्यात अशी मागणी पेडणे तालुका भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी पेडणे मामलेदार व उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन केली आहे.
पेडणे मामलेतदार अनंत मळीक याना निवेदन पेडणे भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष उमेश तळवणेकर यानी सादर केले, त्यावेळी हरमल पंचायतीचे पंच प्रवीण वायगणकर, पेडणे भंडारी समाजाचे माजी खजिनदार रोहिदास भाटलेकर व सतिश धारगळकर उपस्थित होते.
पेडणे मामलेदार व उपजिल्हाधिकारी यानानिवेदन देऊन सुद्धा कसलीच दखल घेतला नाही तर आपण आठ दिवसात पेडणे मामलेतदार व पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यल्याच्यासमोर एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या दहा वर्षांत पेडणे ममलेतदार कार्यालयात तलाठी अपुरे आहेत, दोन किंवा तीन पंचायत मध्ये एक तलाठी अशी स्थिती आहे, अनेक वेळा पेडणेत तलाठी नेमावे अशी मागणी या अगोदर भंडारी समाजातर्फे करून सुद्धा आजतागत तलाठी नेमले गेले नाही, थानीक पेडणेतिल राजकीय नेते ते करण्यास अपयशी ठरले आहे.हे लक्षात घेऊन आपण पुढील दहा दिवसांत जर तलाठी पेडण्यातील प्रत्येक पंचायत मध्ये किमान एक तलाठी नेमला नाही तर आपण कार्यालया समोर लक्षणीय उपोषण करून सरकारचा सरकारी यंत्रणेचा जाहीर निषेध करणार असल्याचे पेडणे भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.
गेल्या तीन वर्षात अशोक नाईक गोव्याचे भंडारी समाजाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे लक्ष समाजाकडे नसून राजकीय पुढाऱयांकडे सेल्फी काढण्यातच ते धन्यता मानता आहे. त्यामुळे समाज राहिला बाजूला अशी स्थिती अशोक नाईक यांनी करून सोडली आहे . याचा विचारही गोव्यातील समाज बांधवांनी करण्याची गरज आहे असेही तळवणेकर यांनी पुढे बोलताना सांगितले.