दैनंदिन जीवनात अडचणी : तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
दिव्यांग, विधवा, निराधार आणि वयोवृद्धांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता शासनाकडून मासिक पेन्शन दिली जाते. मात्र काही लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाली आहे. त्यामुळे त्यांना पेन्शनपासून वंचित रहावे लागत आहे. अशा लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात आपल्या कागदपत्रांसह संपर्क साधून पेन्शन पूर्ववत सुरू करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार कार्यालयातून करण्यात आले आहे.
शहरासह ग्रामीण भागात अंध, दिव्यांग आणि वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. अशा लाभार्थ्यांना दर महिना पेन्शन दिली जाते. यामध्ये आता 200 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र काही पेन्शनधारकांची पेन्शन बंद झाल्याने पेन्शनपासून वंचित रहावे लागत आहे. निराधारांना आधार देण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत शासनाकडून सात प्रकारच्या पेन्शन योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र बरेच लाभार्थी या पेन्शनपासून वंचित आहेत.
सामाजिक सुरक्षा योजनेतून ज्ये÷ नागरिकांसाठी इंदिरा गांधी वेतन, संध्या सुरक्षा योजना, विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन, दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग पेन्शन, 40 वर्षांहून अधिक वयाच्या अविवाहित महिलांसाठी मनस्विनी योजना अशा मासिक पेन्शन योजना सुरू आहेत.
60 वर्षांहून अधिक वयाच्या ज्ये÷ नागरिकांसाठी इंदिरा गांधी वृद्धाप वेतन योजनेतून 600 रुपये, विधवा महिलांसाठी 600 रुपये, दिव्यांग व्यक्तींसाठी 600 रुपये, 70 टक्क्मयांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना 1400 रुपये पेन्शन दिली जाते. अलीकडे या पेन्शनमध्ये वाढदेखील झाली आहे. मात्र काही पेन्शनधारकांची पेन्शन विविध कारणांनी बंद झाली आहे. त्यामध्ये विधवा महिलांचा समावेश अधिक आहे. अशांना दैनंदिन गरजा भागविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बंद झालेल्या पेन्शनधारकांनी ऑर्डर कॉपी, आधारकार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.