प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून वळीव पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय माळरानावर ओला चारा निर्माण झाल्यामुळे धनगर बांधवांची मेंढरे चरताना दिसत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असला तरी मशागतीची कामे वेळेत संपविण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. तालुक्मयातील काही भागात भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे काही शिवारात अधिक ओलावा असल्याने मशागतीच्या कामात अडथळा येत आहे. एकंदरीत वळीव पाऊस पुरेसा झाल्याने शेतकरी मशागतीच्या कामात मग्न झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, कुदेमनी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, बेळगुंदी, बेळवटी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी आदी भागात मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. माळरानावरील जमिनीत विशेषतः बटाटे, रताळी, भुईमूग, मका, नाचणा आदी पिके घेतली जातात. त्यामुळे माळरानावरील मशागतीची कामेही हाती घेण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने वळीव पावसाने झोडपल्याने मशागतीच्या कामांसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी शेणखत घालणे, बांध घालणे, ट्रक्टरच्या साहाय्याने पलटी मारणे, बैलजोडीच्या साहाय्याने नांगरट करणे, कुळवण करणे आदी कामात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.