आज 11 सप्टेंबर! याच दिवशी अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर दहशतवादी हल्ला झाला होता नि कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आजही त्या घटनेची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. जगभर अशा दहशतवादी संघटना विध्वंसक कृत्ये सतत करीत असतात. पण असे करणाऱयांचाही कधी ना कधी विनाश हा ठरलेलाच असतो. इतक्मया टोकाचा विचार करणारी माणसे इतकी क्रूर का होतात? हे सांगणारे काही श्लोक संस्कृतमध्ये आहेत.
पैशुन्यं साहसं द्रोहं ईर्ष्यासूयार्थदूषणम्। वागदण्डजं च पारुष्यं क्रोधजोए पि गुणोष्टक:।। अर्थ:- चहाडी, साहस, द्रोह, ईर्षा, मत्सर, द्रव्याचे अपहरण, वाणीची कठोरता आणि निर्दयता हे आठ दुर्गुण क्रोधातून निर्माण होतात.
म्हणजेच या साऱयामागे क्रोध हे मूळ कारण असते. वरील साऱया व़िकृती त्याच्यामुळे निर्माण होतात. क्रोधामुळे माणूस दुसऱयाचा नाश करण्याचा विचार करतो. माणूस आणि पशु दोघांनाही क्रोध येतो. पण प्रयत्नाने माणूस क्रोध आवरू शकतो, पशु नाही. हाच दोघांच्यातील फरक आहे. पण ज्या माणसांना आपला क्रोध आवरता येत नाही, तो माणसाच्या रूपातील पशुच आहे. अर्जुनाने क़ृष्णाला
प्रश्न विचारला होता, ‘माणसे पाप का करतात?’ तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले, ‘काम व क्रोध या दोन विकृती माणसाला पाप करायला लावतात!’ म्हणूनच क्रोधाला महाशन, महाखादाड म्हटले आहे. सध्या ज्या प्रकारचे राजकारण चालले आहे, ते यातच मोडते. म्हणून ज्यांनी क्रोध जिंकला, त्यांनी सर्व जिंकले.
धन्यास्ते पुरुषश्रे÷ा ते बुद्ध्या कोपमुत्थतिम्। निरुंधन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवाम्भसा।। अर्थ:- ज्यांनी बुद्धीपूर्वक क्रोध नाहीसा केला, ते पुरुष श्रे÷ व धन्य आहेत. पेटलेला अग्नी पाण्याने शांत करावा, त्याप्रमाणे हे क्रोध जिंकलेले महापुरुष आपला क्रोध शांत करतात. मोठमोठे संत हे क्रोध जिंकलेले महापुरुष होते. काही दुष्ट लोकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी आपला शांतपणा सोडला नाही. त्यामुळे नीच माणसांनाच स्वतःची लाज वाटली आणि ते त्यांना शरण गेले. अशा अनेक गोष्टी आपण नेहमी वाचत असतो, ऐकत असतो. म्हणूनच क्रोधाला नियंत्रणात ठेवणे माणसाने शिकले पाहिजे. निर्माण झालेला क्रोध क्षमेने दूर होतो. साप ज्याप्रमाणे जुनी कात टाकून नवीन धारण करतो, त्याप्रमाणे क्रोध टाकून क्षमा धारण करतो, तोच खरा माणूस!