18 जणांचा बळी : विकेंड लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱयांची तपासणी सुरु : 511 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी /सातारा
जिह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 1.49 ने कालपेक्षा आज वाढलेला दिसत असून 9.75 वर आला आहे. काल दिवसभरात जिह्यात 1005 जण बाधित आढळून आले असून 18 जणांचा बळी गेला आहे. सातारा, कराड, खटाव, कराड या तीन तालुक्यात तीन अंकी बाधित संख्या असून विकेंड लॉकडाऊन असल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱया वाहनांवर सायंकाळी कारवाई सुरु केली होती.
जिह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी आल्याने अशंतः लॉकडाऊन शिथील झाल्याने पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या तेरा दिवसांपूर्वी 1 हजारच्या वर रुग्ण संख्या होती. तेरा दिवसानंतर ही रुग्णसंख्या 1005 वर गेली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये जिह्याचा पॉझिटीव्हीटी रेट टप्याटप्याने वाढतच चालला आहे. त्यातच दि.24 रोजी पॉझिटीव्हीटी रेट हा 7.02 इतका होता तर दि.25 रोजी हा 8.26 होता. यामध्ये 1.06 इतका रेट वाढला गेला. तर दि.26 रोजी 9.75 रेट आला असून तो 1.49 ने वाढला आहे.
1005 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू
सातारा जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1005 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 25 (8465), कराड 246 (26904), खंडाळा 38 (11685), खटाव 158 (19289), कोरेगांव 73(16559), माण 56(13059), महाबळेश्वर 20(4245), पाटण 37(8318), फलटण 69 (28192), सातारा 224 (39893), वाई 44 (12563) व इतर 5 (1290) असे आज अखेर एकूण 190462नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (192), कराड 8(794), खंडाळा 0 (149), खटाव 1 (479), कोरेगांव 0 (380), माण 1(256), महाबळेश्वर 1 (45), पाटण 1 (194), फलटण 0 (280), सातारा 4 (1222), वाई 1(330) व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4321कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
511 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 511जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.