सातारा, प्रतिनिधी
लसीच्या चर्चा रंगत असताना कोरोना पॉझेटिव्हीटी रेट कमी होत आलाय. या पंधरवडय़ात 28 हजार 802 नमुने तपासले त्यात 2,208 बाधित सापडले आहेत तर 62 मृत्यू झाले आहेत. सातारा जिह्यात उपचारार्थ रुग्णांची संख्या अद्याप पाचशेच्या वर आहे तर कोल्हापूर जिह्यात 99 तर शहरात केवळ 1 रुग्ण उपचारार्थ आहे. म्हणजे साताऱयाला अद्याप काळजी घेण्याची गरज असून शनिवारी दिवसभरात …….. बाधित सापडले असून 189 जणांना मुक्त करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा दिवसांत 62 जणांचा बळी
गेल्या पंधरा दिवसात कोरोनामुळे 62 जणांचा बळी गेलेला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 708 जणांमध्ये पंधरा दिवसात 367 जण वाढले. पंधरा दिवसात 28 हजार 802 जणांचे नमुने तपासणी केली गेली त्यापैकी 2 हजार 208 जण बाधित आढळून आले तर 2 हजार 513 जण बरे होऊन घरी गेले. पंधरा दिवसांचा अहवाल पाहता बरे होण्याचे आणि बाधित होण्याचे प्रमाण यात फरक दिसून येत आहे. बरे होण्याचे प्रमाण निश्चित जास्त आहे. उपचार घेणारे जेमतेम दिसून येत आहेत.
वाढती थंडी काळजीचे कारण
गेल्या तीन दिवसांपासून जिह्यात थंडी वाढू लागली आहे. कोरोनामुळे आधीच हैराण झालेले थंडीमुळे आणखी काळजीचे वातावरण बनले आहे. थंडीच्या महिन्यात ज्यांना ह्रदयरोग व जुनाट श्वसनाचे त्रास वाढत असतात. त्यांना थंडी बादते त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने आणखी काळजी घेणे जरुरीचे आहे, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
189 नागरिकांना दिला डिस्चार्ज शनिवारी संध्याकाळपर्यंत 189 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 468 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.