लॉकडाउनमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या आणि शशांक शेंडे यांचे बहुरूपी प्रोडक्शन आणि विजय शिंदे यांचे नाईंटीनाईन प्रोडक्शन यांच्या
पोरगं मजेतय या नविन चित्रपटाची घोषणा झाली आणि आता लॉकडाउनमध्येच या चित्रपटाची शूटिंग सुद्धा पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी या आधी यंग्राड, रिंगण आणि कागर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे .
शूटिंग पूर्णात्वाबद्दल माहिती देताना चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे यांनी एक चित्रपट निर्माता या दृष्टीने सांगितले, चित्रपट करताना मुळातच शेकडो अडचणींवर मात करावी लागते. त्यातच कोरोनाच्या संकटाने सबंध जगाचीच गती बिघडवून टाकल्यावर निर्माता म्हणून माझ्यासमोर सोपा पर्याय होता की शुटींग पुढे ढकलायचं. पण मी विचार केला की, कलाकारांना व तंत्रज्ञांना आत्ता या क्षणी सगळ्यांत जास्त गरज आहे ती पैशांची नव्हे, तर स्वाभिमानाच्या रोजीरोटीची आणि आपलं घर चालतंय या मानसिक समाधानाची. हे एकदा मनाशी पक्कं ठरल्यावर मग मी व माझ्या टीमने कंबर कसली आणि शासनाने सांगितलेल्या एकूण एक सुरक्षेच्या उपायांवर टिकमार्क करत आम्ही कामाला भिडलो. आपलं लोकेशन, आसपासचा परिसर यांच्या स्वच्छतेवर भर दिला, कलाकार व तंत्रज्ञांच्या सुरक्षेला अतोनात महत्त्व दिलं. त्यासाठी आम्ही खूप सार्या अभिनव उपायांचाही अवलंब केला. खूपश्या ठिकाणी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात आलं. मजा तर सगळेच चित्रपट करताना येते, पण श्पोरगं मजेतंयश् करताना सगळ्यांच्या चेहर्यावर एक आगळंच समाधान झळकत होतं. या चित्रपटाने शिकवलं की, हिंमत असेल तर अडचणींवर मात करून खूप काही साधता येतं. पोरगं मजेतंयने अनुभवातून शिकवलेला धडा आयुष्यभर बळ देत राहिल!
चित्रपटाच्या शूटिंग प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक मकरंद माने यांना विचारले असता त्यांनी सांगितले, करोना काळात शूटिंग करणं खूप धोक्याचं आहे हे अगदीच मान्य आहे पण जर का आपण सर्वांनी मिळून स्वत:ची तसेच आजूबाजूला असणार्या सर्व व्यक्तीची योग्य ती काळजी घेतली तर कोणाला कसलाही त्रास न होता आपण वेळेत सर्व कामे करू शकतो हा कॉन्फिडन्स पोरगं मजेतय च्या शूट दरम्यान निश्चितच आम्हाला मिळाला. ह्या दरम्यान सर्व टीम ची काळजी तर घ्यायची होतीच शिवाय ज्या गावात शूटिंग करतोय ते गाव, आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहिला पाहिजे हे जास्त महत्वाचं होत आणि कोणाला कसलाही आजार न होता आम्ही संपूर्ण शूटिंग अगदी नियमपूर्वक पार पाडले.