भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा, हिम्मत असेल तर एकत्र टिबेट करा, खरे कोण जनतेला कळू दे
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणावर केंद्राकडे बोट दाखवून शरद पवार आमच्यावर खापर फोडत आहेत. स्वातंत्र्यापासून 58 वर्षे देशात त्यांच्या विचारांचे सरकार होते. त्यावेळी 50 टक्क्यांची अट काढण्याची बुद्धी का सूचली नाही. असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. खऱ्याचा सामना करता येत नसेल तर समाजाची दिशाभूल करायची ही त्यांची सवय आहे. आता समाजाल गोंधळून टाकण्यासाठी ते गावोगाव फिरणार आहेत. पण ते ज्या ठिकाणी सभा घेतील त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सभा घेऊन त्यांचा पोलखोल करु असा इशाराही त्यांनी दिला.
जनेतला खरे काय आहे ते कळण्यासाठी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुम्ही एकत्रित माध्यामांसमोर मंत्रालयात डिबेट करा, असे खुले आव्हानही त्यांनी पवार यांना दिले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 50 टक्के मर्यादा ओलांडल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. केंद्राने राज्यांना अधिकार दिल्याचा गैरसमज आहे, घटना दुरुस्ती म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल अशी वक्तव्ये केल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील प्रसारामाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी पवार यांची मानसिकत दिसत नाही. प्रकरण अंगलट आले की ते नेहमी दिशभूल करणारी वक्तव्ये करतात. खोट बोल पण रेटून बोल अशी त्यांची जुनीच सवय आहे. पण त्यांच्या भूलथापाना मराठा समाजा कदापि भुलणार नाही. तुमचे राज्य होते त्यावेळी 50 टक्क्यांची अट वाढवण्यासाठी कोणी हात बांधले होते. तुम्हाला मुळात मराठा समाजाल आरक्षणच द्यायचे नव्हते. तुमचा हेतू साफ आहे. तमुची मानसिकता असती तर सर्वोच्च न्यायालयात नेटाने का लढला नाही.
अशी विचारणा करत ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवण्याचे काम केले. त्यापुढे तुम्हाला टिकवता आले नाही. असे सांगत त्यांनी सरकारच्या चालढकल धोरणाचा फटका मराठा समजाला बसला आहे. राज्यपालांच्या वयावर बोलणाऱयांनी स्वता:च वयही ध्यानात घ्यावे असा टोलाही त्यांनी लगावला भाजपच्या पदाधिकाऱयांना केंद्राचे कामकाज समजण्यासाठी दिल्ली दौरा केल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा मागास ठरवणे आवश्यक
मराठा समाजातून ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी पुढे येत आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, ओबीसीच्या बाबतही सरकारने गोंधळ घातला आहे. मागासवर्ग आयोग नेमला मात्र त्याला बेजट दिले नाही. त्यामुळे आयोगाचे काम ठप्प आहे. हे ही जनतेला समजले पाहिजे. ओबीसीमध्ये कोणत्या समाजाचा किती टक्का येतो हे तपासण्यासाठी पहिल्यांदा जातनिहाय गणना झाली पाहिजे. यासाठी तातडीने काम सुरु झाले पाहीजे मागासवर्ग आयोगाला निधी देऊन तातडीने मराठा मागास आहे. हे ठरवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. तरच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू शकते.