प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारचा आदेश असल्याचे कारण दाखवत रविवारी सकाळी पोलिसांनी कांदा मार्केट परिसरातील फटाके विक्री करणारी दुकाने बंद करायला लावली. ऐन सणासुदीत दुकाने बंद करावयास लावल्याने व्यापाऱयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यामुळे व्यापाऱयांनी एकत्रित येऊन पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही निष्फळ ठरला.
यावषी दिवाळीमध्ये फटाक्मयांची आतषबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फटाक्मयांची विक्री करू नये असा आदेश राज्य सरकारने बजावला होता. त्यानंतर पर्यावरणपूरक फटाक्मयांना परवानगीही देण्यात आली होती. परंतु शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या वेळी मोठय़ा प्रमाणात फटाक्मयांचा वापर झाल्यामुळे रविवारी पोलीस प्रशासनाने फटाके विक्री करण्यास बंदी घातली. सकाळी 10 च्या सुमारास फटाके विक्री करणाऱया दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले.
यानंतर व्यापाऱयांनी एकत्रित येऊन मार्केट पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य सरकारचा आदेश असल्यामुळे दुकाने बंद ठेवा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे व्यापाऱयांवर मात्र संकट कोसळले आहे. दिवाळीचा सण हा असाच गेल्यामुळे दुकाने चालवायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.