मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
भाषावार प्रांतरचना करताना अन्याय करत सीमावासियांना म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले. याचा निषेध म्हणून मागील 65 वर्षे संपूर्ण सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येतो. यावषी कोरोनाचे कारण सांगून सायकलफेरी व सभेला निर्बंध घातले जात आहेत. प्रशासनाने निर्बंध घालावेत पण निषेध व्यक्त करण्याचा मार्गही दाखवावा. बुधवारी पोलीस प्रशासनाने चर्चेसाठी बोलाविले असून, त्यानंतरच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आपली पुढील भूमिका जाहीर करील, असा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा मंदिर येथे सभासदांची बैठक पार पडली. यावेळी घटक समित्यांच्या प्रमुखांकडून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काळा दिन पाळणे गरजेचे आहे. दरवषी हजारोंच्या संख्येने सीमाबांधव एकत्रित येऊन आपल्यावरील होणाऱया अन्यायाचा निषेध करतात. त्यामुळे यावषीही काळय़ा दिनाच्या सायकलफेरीला व जाहीर सभेला परवानगी द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
प्रारंभी सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रणजित चव्हाण-पाटील यांनी आभार मानले. यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, निपाणी येथील जयराम मिरजकर, खानापूर येथील सूर्याजी पाटील, एल. आय. पाटील, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, सुरेश राजुकर, ऍड. राजाभाऊ पाटील, बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, एस. एल. चौगुले, नाना पाटील, बी. ओ. येतोजी, जोतिबा पाटील यासह इतर उपस्थित होते.