सातारा :
सातारा शहरात गुरुवारी वाहतूक शाखेच्या पोलीसांनी वाहनधारकांवर कारवाई केली. यामध्ये वाहनधारकांची कागदपत्रे तपासण्यात आली. या कारवाईची वाहनधारकांच्यात धास्ती निर्माण झाली होती.
अनलाँक चा दुसरा टप्पा सुरु झाला असून नियमात आणखी शिथीलता मिळाली आहे. यामुळे खरेदीसाठी लोक घराबाहेर पडत आहेत. प्रवासी वाहनापेक्षा खाजगी वाहनांची संख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमी गुरुवारी शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक शाखेचे पाच पोलीस उभे होते. सकाळपासून येणाया प्रत्येक वाहनधारकांना थांबवून त्यांचा लायसन्स, कागदपत्रे यांची तपासणी सुरु होती. ज्या वाहनधारकांकडे कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला, दिवसभर प्रत्येक चौकात पोलीस कारवाई करताना दिसत होते. या कारवाई चर्चा सर्वत्र सुरु होती. यामुळे वाहनधारकांच्यात चांगली धास्ती निर्माण झाली होती.