सातारा
लॉकडाऊन लागू असल्याने विनाकरण बाहेर फिरणाऱयांवर पोलीस कारवाई करत आहेत. ही कारवाई दिवसभर सुरू असल्याने पोलीसांना उन्हात उभे राहणे भाग पडत आहे. ही बाब तरूण भारतने पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने आता चौकात मंडप उभारण्यात आले आहेत.
लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. येत्या 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. तरीही विनाकारण फिरणाऱयांच्या संख्येत वाढ होत आहे. याला आळा बसावा म्हणून पोलीस प्रत्येक चौकात उभे आहेत. यातच तीव्र उन्हाळा सुरू असून पोलीसांना उन्हात उभे राहून कर्तव्य बजावणे भाग पडत आहे. यांची दखल घेत तरूण भारतने प्रत्येक चौकात मंडप उभारण्याचे मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार सर्वत्र मंडप उभारण्यात आले आहेत.