तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होताहेत गैरप्रकार, अटक केलेले अनेक परीक्षार्थी गोकाक तालुक्यातील, पोलीस दलाकडून कठोर उपाययोजना
प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस भरतीसाठीच्या परीक्षेत अलीकडे गैरप्रकार वाढले आहेत. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस दलाने कितीही कठोर उपाययोजना केल्या तरी गुन्हेगार त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत आहेत. खासकरून केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात परीक्षेत गैरप्रकार करताना आढळलेले बहुतेकजण गोकाक तालुक्मयातील आहेत.
गेल्या रविवारी बेळगाव येथील दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करताना काही जणांची धरपकड झाली. सरदार्स हायस्कूल परीक्षा केंद्रावर लक्ष्मण अशीरोट्टी (वय 28) रा. मसगुप्पी, ता. गोकाक याला अटक झाली. तर सीपीएड् मैदानाजवळील वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेतील परीक्षा केंद्रावर सरस्वती अर्जुन पुजेरी (वय 23) रा. तिगडी, ता. मुडलगी या विद्यार्थिनीसह तिचा भाऊ हालाप्पा व त्याचा मित्र लक्ष्मण बंडी यांना अटक झाली.
गैरप्रकाराच्या 14 हून अधिक घटना
त्याच दिवशी जिल्हा पोलिसांनी रामतीर्थनगर येथील एस. एस. डेकोरेटर व इव्हेंट प्लॅनर या कार्यालयाजवळ छापा टाकून 33 मोबाईल संच, 9 मास्टरकार्ड डिव्हाईस, 19 ब्ल्यू टूथ डिव्हाईस, 3 टॅब, लॅपटॉप, प्रिंटर, कार, तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गेल्या दीड वर्षात बेळगाव शहर व जिल्हय़ात पोलीस भरती परीक्षेतील गैरप्रकाराच्या 14 हून अधिक घटना घडल्या आहेत. यापैकी पाच प्रकरणे तपासासाठी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहेत.
दलालांच्या कार्यपद्धतीही बदलल्या
परीक्षेत गैरप्रकार का होतो? याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता पूर्वीपासून पोलीस भरतीच्यावेळी गैरप्रकार होतच आलेले आहेत. यापूर्वी भरतीचे कंत्राट घेणाऱया दलालांचे जाळे अस्तित्वात होते. यामध्ये आजी-माजी अधिकाऱयांचाही सहभाग असायचा. एखाद्या लॉजमध्ये आर्थिक व्यवहार करून संबंधिताची वर्णी लावण्यासाठी धडपड केली जायची. पात्रतेनुसार उमेदवारांची पोलीस दलात भरती व्हावी, यासाठी परीक्षा पद्धतीत आणि भरती प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले. जसेजसे बदल झाले तसेतसे दलालांच्या कार्यपद्धतीही बदलल्या.
लेखी परीक्षेत गुण वाढविण्याचे सांगून उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळली जात होती. त्यानंतर शारीरिक चाचणीत मदत करण्याचे सांगून सावजाला गंडविणाऱया टोळय़ा उदयास आल्या. अजयकुमार सिंग हे राज्य पोलीस महासंचालक असताना पोलीस भरती व परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्यात आला. जेणेकरून मध्यस्थ व दलालांचे काहीच चालू नये. जे पात्र आहेत, त्यांना भरतीची संधी मिळावी, याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतरही बदल होतच आहेत.
टोळीकडून तंत्रज्ञानाची मदत
सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. गोकाक तालुक्मयात एक अशी टोळी तयार झाली आहे, जी पोलीस भरतीचे कंत्राट घेतले की त्या उमेदवाराच्या भरतीसाठी वाट्टेsल ते करण्याची त्यांची तयारी आहे. या टोळीने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या मदतीने परीक्षार्थींना उत्तरे पुरविली जातात. हे प्रकार केवळ बेळगावातच नव्हे तर राज्यातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात घडले आहेत. हे प्रकार करणाऱया टोळीतही काही पोलिसांचा सहभाग आहे.
सरकारी नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. पाच जागा भरायच्या असतील तर 10 हजारहून अधिक अर्ज येतात. अशा परिस्थितीत पाच जणांची निवड करणे व्यवस्थेसमोर आव्हानाचे ठरते. प्रत्येकाला वाटते की ही नोकरी आपल्यालाच मिळावी. या स्पर्धेतूनच मधला मार्ग म्हणून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून सर्वात जास्त गुण मिळविण्याचा फंडा शोधण्यात आला आहे. याकामी लाखो रुपयांची उलाढाल होते. गैरप्रकार करताना सापडले तर त्यांचे आयुष्य बरबाद होते. तरीही हा जुगार उमेदवार खेळत आहेत. गेल्या आठवडय़ात बेळगाव येथे दाखल झालेल्या तीन गुन्हय़ांचा तपासही सीआयडीकडे जाण्याची शक्मयता आहे.