मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सुचना
डिचोली/प्रतिनिधी
लोक योग्य पद्धतीने सामाजिक अंतर व इतर गोष्टी पाळत नाही असे दिसून आले असून कारोनाची लागण झालेल्या पैकी बरे होण्याचे? प्रमाण हे 50 टक्के आहे. कोरोना रूग्ण वाढू नयेत यासाठी प्रत्येकाने सर्व ती खबरदारी घेणे बंधनकारक आहे. मात्र तसे घडत नसल्याने आता पोलीस यंत्रणा व सर्व सरकारी यंत्रणेने कडक पणे काही गोष्टी हाताळणे गरजेचे असून पार्टय़ा, वाढदिवस यासाठी कोणतीही गर्दी न करता सर्वानी आरोग्य दक्षता घेतली नाही तर दंडात्मक व पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी पोलिसांची कडक राहावे असे आदेश मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज डिचोलीत दिले.
डिचोली तालुक्मयातील कोवीड परिस्तितीचा आढावा घेण्यासाठी डिचोली पोलीस कार्यालयात विशेष बैठक झाली. त्यावेळी सभापती राजेश पाटणेकर, आमदार प्रवीण झाटय़?, उपजिल्हाधिकारी दिपक वायांगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, पोलीस महानिरीक्षक उत्क्रीष्ट प्रसुन्न, आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर, डॉ उत्तम देसाई, डॉ. सिद्धी कासार, पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे, निरिक्षक संजय दळवी, विविध पंचायतीचे सरपंच व इतर उपस्तीत होते.
डिचोली तालुक्मयातील आरोग्य सेवा रुग्णां?ची देखभाल, विलगीकरण कक्ष, त्यात निर्माण
झालेले सामाजिक प्रश्न याबाबत मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी अधिकारी वर्गाशी मोकळी चर्चा करून कोणती समस्या आहे ते जाणून घेतले.
लाऊडस्पीकरवर रोज दिवसातून तीन वेळा आवाहन करून गावागावातील लोकांना जागृत करून मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, कारणाशिवाय बाहेर न फिरणे आदी बाबत खबरदारी व जागृती करण्याचे आवाहान केले.
मार्च महिन्यात पोलिसांनी कडक भूमिका घेतली. मात्र आता ते थोडेसे नरमाईचे तंत्र वापरत आहेत. त्यामुळे तरुण वर्ग व सामान्य नागरीक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे आजपासून पोलिसांनी कडक भूमिका घेताना नियमं उल्लंघन करणाऱया??ना पोलीस ठाण्यात आणून बसवावे व इतर कारवाई करावी. कुणीच नियम तोडू नये थोडेसे पालन केले, शिस्त ठेवली तर रोगावर सहज मात शक्मय असल्याचे त्यां?नी सांगितले.
अनेक भागात तालुक्मयात जे निर्बंध घातले आहेत ते शिथिल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या
कामगार वर्ग पुन्हा गोव्यात येत आहेत, त्यांची तपासणी व कंत्राटदारास जबाबदारी घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. आगामी तीन महिने खूप महत्वाचे असून धोका समजून घेत प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळली तरच करोनाला लीलया हरवणे शक्मय आहे. पावसाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत खूपच सजक राहावे, असे आवाहन केले. सर्व सरकारी अधिकारी नगरपालिका व पंचायत यांनी आपल्या भागातील जबाबदारी सांभाळत सहकार्य करावे कुणीच चालढकल करू नये असेही आवाहन त्यांनी केले.
रस्त्ययवर जे फिरते विपेते फळे, भाजी, मासळी विकतात त्यांनी बाझारत एकाच ठिकाणी बसावे. प्रत्येकजण गाडी रस्त्याच्या बाजूला ठे??ऊन विक्री करीत आहेत. त्यांना त्वरित बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणत्याही परिस्तितीत लोकांना एकत्र येण्यापासून रोखणे, पार्टय़ा वाढदिवस यातूनच आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धोका समजून घेत प्रत्येकान खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
या वेळी डॉ मेधा साळकर, तुळसीदास चोडणकर, डॉ सिद्धी कासार, तसेच पत्रकारांनी सूचना केल्या.