केवळ चार दिवसाच्या कालावधीत 1 लाख 25 हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला योजनेचा लाभ
प्रतिनिधी /सातारा
संपूर्ण देशभरामध्ये पोस्ट ऑफीस अंतर्गत आधारला मोबाईल लिंक करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. ही मोहिम सातारा जिल्हय़ातही 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. या मोहिमेला जिल्ह्य़ातुन उत्तम प्रतिसाद मिळाला. आधारद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी सातारा डाक विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सातारा पोस्ट विभागाचे नाव देशात अव्वल झाले आहे.
शासनाच्या सवलत योजनांसाठी आधार लिंक गरजेचे असून या मोहिमेत जिल्हय़ातील 1 लाख नागरिकांचे आधारलिंक करण्याचा मानस सातारा पोस्ट विभातर्फे आखण्यात आला होता. पण त्याहुन ही अधिक म्हणजे दि. 30 रोजी दुपारी 3 वा. पर्यंत 1 लाख 25 हजाराहुन अधिक नागरिकांचे आधार लिंगींग केल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हय़ातील पोस्ट विभागातील कर्मचाऱयांनी आपल्या कामकाजाच्या वेळे पेक्षा ही अधिक वेळ कार्यालयात राहुन ही मोहिम यशस्विरित्या पुर्ण केली आहे, तसेच देशात अव्वल येण्याचा मान ही पटकाविला आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत नागरिकांना बँकिंग सेवा दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनच्या माध्यमातून जिल्हय़ातील 700 हून अधिक पोस्ट कार्यालयातून युआयडीएआय आधारला मोबाइल लिंकिंग सेवा देण्यात आली. आधारला मोबाइल लिंक केल्यास आधारशी लिंक असलेल्या इतर माहितीचा दुरूपयोग इतर कोणी करू शकणार नाही. तसे झाल्यास लिंक असलेल्या मोबाइलवर लगेच मेसेज जातो. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसणार आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातारा डाक विभागाचे डाक विभागाने आधारला मोबाइल लिंकिंगची मोहीम सुरू केली आहे. पोस्टमनद्वारे आधार अपडेट, मोबाईल लिंक करण्यात आले.
वेळेची मर्यादा न पाळता मोहिम केली यशस्वी
पोस्ट विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत पोस्ट विभातील कर्मचाऱयांतर्फे नागरिकांच्या घरी जाऊन, कॅम्प लाऊन ही मोहिम राबविण्यात आली. तसेच वेळेची मर्यादा न पाळता ग्रामीण डाक सेवक आणि पोस्ट विभागाच्या बांधवांनी ही मोहिम यशस्विरित्या पार पाडली आहे. गुरूवारीही रात्री उशीरा पर्यंत ही मोहिम राबविण्यात येत होती.
वसंत कुंभार –पोस्टमन एमपीएस संघटना सातारा, डिव्हीजनल सेक्रेटरी
कर्मचाऱयांचे विशेष श्रेय
आधार लिंगींग मोहिमेला नागरिकांनी अधिक प्रमाणात प्रतिसाद दिला. याचे सर्वाधिक श्रेय हे सातारा जिल्हय़ातील पोस्ट विभागातील कर्मचाऱयांना जाते. कारण कित्तेक कर्मचाऱयांनी तर पहाटे पाच पासून ते रात्री 12 वा. पर्यंत नागरिकांचे आधार लिंकींग करण्याचे काम केले होते. त्यामुळे सातारा जिल्हा पोस्ट विभागाचे नाव देशात उंचाविले गेले आहे.
अपराजिता मिध्रा –सातारा डाक विभागाच्या प्रवर अधिक्षक