वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता ग्रामीण भागामधील पोस्टाच्या कार्यालयाच्या सर्व शाखांमध्ये सर्व बचत योजनांची खाती उघडण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आतापर्यंत सर्व प्रकारच्या योजना या शहरी भागातच उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परंतु या बदलामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात जाण्याचा मनस्ताप सोसावा लागणार नसल्याचे स्पष्टीकरण पोस्टाने दिले आहे.
ग्रामीण क्षेत्रातील पोस्ट कार्यालयाच्या एकूण शाखा या 131113 आहेत. या शाखांमध्ये पत्र, स्पीड पोस्ट, पार्सल, इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्स्फर, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस सेव्हींग्स अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट, टाईम डिपॉझिट आणि सुकन्या समृद्धी अकाउंटची सुविधा देण्यात आली आहे.
आता ग्रामीण भागातील गावांमध्ये पोस्ट कार्यालयात पब्लिक प्रोव्हीडेंट फंड(पीपीएफ),किसान विकास पत्र(केव्हीपी), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), मंथली इन्कम योजना (एमआयएस) आणि जे÷ नागरिक बचत योजना (एससीएसएस)यासारख्या गुंतवणूक योजनांचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.