बेंगळूर : पोहायला गेलेल्या तीन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना हावेरी जिल्हय़ाच्या हानगल तालुक्यातील मंतगी गावात रविवारी घडली आहे. अख्तर रजा यळवट्टी (वय 16), अहमद रजा अंची (वय 16) आणि साहिल डोंग्री (वय 17) अशी बुडून मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, अख्तर, अहमद रजा आणि साहिल या तिघांनी रविवारी गावातील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न लागल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी सदर तिन्ही बालकांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. घटनास्थळी हनगल पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद हनगल पोलीस स्थानकात झाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleआरक्षणासंबंधी कर्नाटकाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
Next Article आम्हाला राज्यातील जनतेचे आरोग्य महत्त्वाचे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.