प्रतिनिधी/ सातारा
यावर्षी दि.21, 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. ही अतिवृष्टी विशेषकरुन महाबळेश्वर, वाई, पाटण या तालुक्यात झाली. या विक्रमी पावसामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रतापगडाच्या बुरुजाचे काम अभेद्य असे टिकून राहिले. विशेष म्हणजे हे काम सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील चंदनवंदन येथील रमेश चंदनकर यांनी केलेले आहे. त्यांनी आपल्या स्थापत्य कलेचा ठसा देशभरात उमटवला गेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या यवनी संकटाचा खात्मा ज्या गडाच्या पायथ्याला केला तो प्रतापगड. या प्रतापगडाच्या बुरुजाची दोन वर्षापूर्वी पावसात हानी झाली होती. त्या बुरुजाची डागडुजी सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने चंदनकर इंजिनिअरींग ऍण्ड रिसर्च प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली. हे काम गत सहा महिन्यापूर्वी करण्यात आले. हे काम अतिशय दर्जेदार असे करण्यात आले असल्याने यावर्षी झालेल्या विक्रमी पावसामध्ये अभेद्य असेच राहिले आहे. चंदनकर इंजिनिअरींगचे संस्थापक रमेश चंदनकर हे मुळचे सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील चंदनवंदनचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव येथे तर इंजिनिअरींगचे शिक्षण हे नागपूर येथे झाले. त्यांनी जम्मू कश्मिरपासून केरळपर्यंत अनेक कामे केलेली आहेत. पुणे येथील कात्रजच्या बोगद्याच्या आसपास व बोगद्याच्या आतमध्येही त्यांनी काम केलेले आहे. तसेच पुणे येथे लवासा प्रकल्पामध्ये मातीची दरड होती. ती मातीची दरड त्यांनी अतिशय वैज्ञानिक दृष्टीकोन वापरुन साचेबद्द अशी धोका होवू नये केलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये प्रतापगडाच्या बुरुजाचे त्यांनी काम केले. हे काम तसे अवघड होते. त्यांच्या कामाला पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगने मान्यता दिल्यानंतर पूर्ण केले. त्यांचे काम या विक्रमी पावसातही अभेद्य असे राहिल्याने त्यांचे कौतुक ाsत आहे.