नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रोख रकमेच्या व्यवहारांसंबंधी नवा नियम घोषित केला आहे. आतापर्यंत प्रतिदिन 20 हजार रूपयांच्या रोख रकमेचे व्यवहार करण्यास अनुमती होती. यापुढे ही रकमेची मर्यादा 10 हजार रूपये असेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. नागरीकांनी त्यांचे बहुतेक व्यवहार धनादेशाच्या माध्यमातून करावेत. मात्र काही कारणांमुळे धनादेश दिल्यानंतरही रोख रक्कम द्यावी लागल्यास ती प्रतिदिन 10 हजार रूपयांपेक्षा अधिक असू नये, असे नव्या आदेशात मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.