15 वर्षांपासून सुरू आहे उदात्त कार्य
माणूस विश्वासघात करू शकतो, पण प्राणी नाही. इमानदारीप्रकरणी श्वानांना कुठलीच तोड नाही. तरीही रस्त्यांवर भटक्या श्वानांची गर्दी पोट भरण्यासाठी अनेकांच्या चेहऱयांकडे आस लावून दिसत असते. या बदल्यात कुणी दगड फेकून मारतो, तर काही जण पळवून लावतात, तर काही लोक सहानुभूतीपोटी शिल्लक अन्न देतात. पण एक महिला या भटक्या श्वानांसाठी तारणहारापेक्षा कमी नाही. ही महिला 15 वर्षांपासून 800 अधिक श्वानांना दरदिवशी अन्न पुरवत आहे.
रजनी शेट्टी या मंगळूर शहराच्या रहिवासी आहेत. तेथे त्या पती आणि तीन मुलांसोबत भाडय़ाच्या घरात राहतात. श्वानांचे पोट भरण्याचे माझे काम 15 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. लोकांच्या सहकार्याने मी दररोज 800 श्वानांचे पोट भरत असल्याचे त्यांनी सांगितले.
घरी करते उपचार
याचबरोबर रजनी या घरीच अनेक श्वान, मांजर, ससे आणि पक्ष्यांची देखभाल करतात. तसेच जखमींवर उपचार देखील करत असतात.
प्रतिदिन शिजतो 60 किलो भात-चिकन
आम्ही दर दिनी रात्री 8 वाजता श्वानांना अन्न खायला देण्यास जातो, जेणेकरून त्यांना वाहनामुळे कुठलीच समस्या होऊ नये. माझे पती, कुटुंब आणि अन्य लोकांनी मला पाठिंबा दिला. मी श्वानांसाठी बचावकार्य देखील करते. श्वानांसाठी दररोज 60 किलो चिकन-भात शिजवत असल्याचे त्या सांगतात.
कशी झाली सुरुवात?
15 वर्षांपूर्वी रजनी यांनी उपाशी आणि हतबल श्वानाला कागद खाताना पाहिले होते. त्यांनी त्वरित एका दुकानातून आमलेट खरेदी करत त्या श्वानाला खायला दिले होते. त्यानंतर त्यांनी श्वानाच्या चेहऱयावरील आनंद पाहिल्यावर भटक्या श्वानांना खायला देण्यास सुरुवात केली होती.
2 हजार मुक्या प्राण्यांना वाचविले
प्राण्यांसाठी केवळ अन्न शिजवत नाहीत, तर त्या त्यांना वाचविण्यासाठी विहिर, नदी, नाला आणि सीव्हरमध्येही उडी घेतात. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी 2 हजार प्राण्यांना वाचविले असून यात श्वान, मांजर, ससा आणि पक्षी सामील आहे.