सुशांत मोरे यांची मागणी : ल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हयात रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा आपल्या परीने काम करत असली तरी त्यांच्यावर ताण येत आहे. सातारा जिल्हयात अनेक ठिकाणी विशेषतः इंजिनयरिंग, फार्मसी, आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून आरोग्य सुविधा पुरवल्यास त्याचे तातडीने कोविड सेंटरमध्ये रुपांतर होऊ शकते तसेच रुग्णांना बेडची उपलब्धता त्वरित होऊ शकते. तरी जिल्हाधिकाऱयांनी तातडीने याबाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हयात काही दिवसांपूर्वी कमी असणारी रुग्णसंख्या सध्या झपाटयाने वाढत आहे. दररोज 200 रुग्ण सापडणारी संख्या आज 600 ते 700 च्या घरात गेली आहे. जिह्यात रोज रुग्ण संख्या वाढत असून सामान्य रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. मेडिक्लेम असलेले, राजकीय वरदहस्त, डॉक्टरांच्या गोतावळ्यातील रुग्णांना व्हिआयपी उपचार मिळत आहेत. परंतु सर्वसामान्यांना अनेक ठिकाणी रुग्णांना तातडीने बेडची उपलब्धता होत नाही.
प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. अद्याप जंबो कोविड हॉस्पिटलच्या प्रस्वाताला मान्यता मिळालेली नाही, अशा स्थितीत प्रत्येक कॉलेजमध्ये विशेषतः आयुर्वेदिक, फॉर्मसी इंजिनियरिंग कॉलेजच्या इमारतींचे रुपांतर कोविड सेंटर मध्ये करणे शक्य आहे. या इमारतींमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून केवळ आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास त्यांचे हॉस्पिटलमध्ये रुपातंरण करणे शक्य आहे. सध्याच्या काळात ते तातडीने होईल असे झाल्यास कोणताही रुग्णाला उपचारासाठी बेडची उपलब्धता तातडीने होऊ शकते.
अनलॉक 4 मध्ये अजूनही महाविद्यालयाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील इंजिनियरिंग, फॉर्मसी, आयुर्वेदिक कॉलेजच्या इमारती ताब्यात घेऊन त्याचे रुपातंरण कोविड हॉस्पिटलमध्ये करावे. यामुळे जिल्हयात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊन त्यांना रुग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रीत करता येईल, असे म्हटले आहे.