प्रतिनिधी/ पणजी
ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेचा तसेच कृती आराखडय़ाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने केला. आज शुक्रवार 2 ऑक्टोबरपासून या योजनेची कार्यवाही सुरू होणार असून ती तीन टप्प्यात राबविली जाणार आहे. राज्य तसेच पेंद्र सरकारच्या सर्व योजना ग्रामपंचायती तसेच जनतेच्या घरादारापर्यंत पोहोचवण्यात येणार असून त्याचा लाभ त्यांना करून दिला जाणार आहे.
पंचायती आत्मनिर्भर, स्वावलंबी क्हाव्यात हा या योजनेमागील उद्देश असून प्रत्येक गावातील गरिबी, दारिद्रय़ दूर करण्याचे प्रयत्न या योजनेतून केले जाणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. 2 ऑक्टोबर 2020 ते ऑक्टोबर 2021 प्रथम टप्पा, 2 ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2022 दुसरा टप्पा, 2 ऑक्टोबर 2022 ते ऑक्टोबर 2023 अशा तीन टप्प्यात या योजनेची कार्यवाही होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
प्रत्येक गावाला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न
प्रत्येक गावाला, पंचायतीला स्वावलंबी करण्यासाठी तेथील लोकांची कुशलता तसेच गावातील इतर गोष्टी हेरून त्याचा तपशील गोळा केला जाणार आहे. त्यानुसार तेथे कोणकोणते उद्योग व्यवसाय चालू शकतात, याचा अभ्यास करून त्यानुसार पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
ग्रामस्थांना कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण
ग्रामस्थांच्या अंगी कुशलता यावी म्हणून प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येणार असून खासगी उद्योगांची वाढ होण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी अशी एकत्रित सेना या योजनेसाठी काम करणार असून प्रत्येक पंचायतीत जाऊन भेटी देणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
प्रत्येक गावांत ‘स्वयंपूर्ण मित्र’ शोधून काढणार
या योजनेत ‘स्वयंपूर्ण मित्र’ शोधून काढण्यात येणार असून त्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. उद्योगवाढीसाठी नोकऱया वाढाव्यात म्हणून प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पंचायती गावे, आर्थिक दृष्टय़ासंपन्न सक्षम व्हावीत म्हणून ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात राज्यातील 41 पंचायतींमध्ये योजना
आज दि. 2 ऑक्टोबर 2020 ते 2 ऑक्टोबर 2021 या एक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात 41 पंचायतीमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. काजू, भाजी, दूध, चिकन, फुले या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकारी अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी अशी सेना गावागावात जाऊन तेथे काय पिकवता येईल याचे मार्गदर्शन पंचायती, स्थानिक युवकांना करणार आहे. त्यात कोणकोणत्या योजना (राज्य-केंद्र) राबवण्यात येतील आणि उत्पन्न कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.