विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचे प्रतिपादन : खानापुरात भाजपच्यावतीने नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार
वार्ताहर / खानापूर
महात्मा गांधीजींनी खेडय़ाकडे चला हेच स्वप्न बाळगले होते. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावचा विकास व देश समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्रामपंचायत पातळीवर विकास होणे म्हणजे संपूर्ण देशाचा विकास आहे. ग्राम पंचायत निधीतून विकासकामे राबवताना केवळ पंचायतीला येणाऱया अनुदानातूनच विकासकामे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहण्यापेक्षा राज्य व केंद्र शासनाच्या अनेक विकसनशील योजना खेडय़ापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक सदस्याने प्रयत्न हाती घेतला तरच प्रत्येक ग्राम आदर्श ग्राम बनवण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले.
मंगळवारी खानापुरात तालुक्मयातील सर्व नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार तालुका भाजपतर्फे आयोजिला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल होते.
उपस्थितांचे स्वागत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सदस्यांची भूमिका कशी महत्त्वाची याबद्दल विचार मांडले. दीपप्रज्वलन व फोटोपूजन उपस्थितांच्या हस्ते केले.
व्यासपीठावर भाजपा नेते विठ्ठल पाटील, विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई, वसंत देसाई, ज्योतिबा रेमाणी, किरण येळ्ळूरकर, मंजुळा कापसे, जितेंद्र मादार, विजय कामत, श्रीकांत इटगी, संजय कंची, मारुती पाटील, प्रदीप सानिकोप, सुंदर कुलकर्णीसह अनेकजण उपस्थित होते. त्यानंतर ग्राम पंचायत निहाय उपस्थित ग्राम पंचायत सदस्यांचा भगवा फेटा, शाल, घालून सत्कार करण्यात आला.
भाजपा महिला घटकाच्या राज्य सचिव धनश्री सरदेसाई म्हणाल्या ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी मतदारांनी बहुतांशपणे तरुणांची निवड केली आहे. महिलांचाही तितकाच सहभाग आहे. भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले, नरेंद्र मोदी देशाचे सेवक म्हणून कार्य करत आहेत. तसेच कार्य प्रत्येक सदस्यांनी आपण एक ग्रामसेवक आहोत अशी भावना ठेवून गावचा विकास साधण्यासाठी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवावे, असे आवाहन केले.
ग्रा. पं. चा आदर्श सदस्यांनी ठेवावा
अध्यक्षस्थानावरून बोलताना भाजपाध्यक्ष संजय कुबल म्हणाले, ग्राम पंचायतीचा आदर्श प्रत्येक सदस्यांनी ठेवावा, लोकसभेत जाताना नरेंद्र मोदींनी नतमस्तक होऊन आपल्या देशसेवेला सुरुवात केली व आपण एक देशसेवक आहोत, अशी भावना व्यक्त करून आज संपूर्ण देशाला जिंकले आहे. खानापूर तालुक्मयातील नंदगड ग्राम पंचायतीनेही देशात पाचवा विकसित ग्राम म्हणून सन्मान मिळवला आहे. हाच सन्मान प्रत्येक ग्राम पंचायतीने मिळवावा, असे आवाहन केले. माजी ता. पं. सदस्य वासंती बडगेर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी तालुक्मयातील 51 ग्राम पंचायतींच्या नवीन सदस्यांचा सत्कार व प्रस्तावना माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी केले. यावेळी तालुक्मयातील बहुतांश ग्राम पंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा प्रधान कार्यदर्शी बसवराज सानिकोप यांनी आभार मानले.