पर्यावरणाचे नुकसान न करता वृक्षसंपदेचे जतन करणे आवश्यक : पर्यावरणपूरक होळी साजरी करणे हितकारक
प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येक भारतीय सण हा वैशि÷य़पूर्ण आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी. मात्र होळी साजरी करताना बऱयाचदा पर्यावरणाची हानी होते. चांगले, बळकट वृक्ष किंवा त्यांच्या फांद्या तोडून होळीनिमित्ताने त्या पेटविल्या जातात. परंतु याने पर्यावरणाचे नुकसान होत असून वृक्षसंपदेचे जतन न केल्यास आपलाही जीव धोक्मयात येवू शकतो. म्हणूनच पर्यावरणपूरक होळी साजरी करणे आवश्यक आहे.
पूर्वीच्या तुलनेत आज वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवादी भूमिका घेत आहेत. झाडे कापून लाकूड वापरण्यापेक्षा लाकडाचा कचरा, वाळलेली पाने असे पर्याय सूचविण्यात येत आहेत. शिवाय गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱया म्हणजेच शेणी होळीमध्ये जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करता येते. याचे अनेक फायदे आहेत.
कोरोनामुळे वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्यावर परिणाम झाले. आघात, आजार खूप सोसले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अर्थव्यवस्था दुर्बल झाली. याचे कारण होते प्रदूषण आणि पर्पवरणावर होणारे त्याचे दुष्परिणाम या सर्वांवर आपण सहज मात करू शकतो. यासाठी बेळगावचे सुपूत्र व ज्ये÷ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे व पर्यावरण तज्ञ मृणाल खर्चे यांनी होळी साजरी करण्याबाबत काही महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे लक्ष वेधले आहे.
ते म्हणतात, गायीच्या शेणाच्या गोवऱया जाळून जो धूर निर्माण होतो. त्यामुळे डास व आरोग्याला घातक विषाणू-जीवाणू नाहीसे होतात. शिल्लक राहिलेल्या राखेत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि काही प्रमाणात उपयोगी धातू असतात. त्यामुळे शेतामध्ये नैसर्गिक सुक्ष्मपोषक खत म्हणून राखेचा वापर करता येवू शकतो. सल्फर ऑक्सिडेशन आणि फॉस्फेट सोल्यूबलायझेशन या प्रक्रिया ही राख जमिनीत घडवून आणते. कचरा निर्मूलन प्रक्रियेमध्ये शेणातील जंतूंमुळे पाण्यातील विरघळलेले धातू, कीटकनाशके व औषध निर्माण आणि पेट्रोकेमिकल प्रक्रियेमध्ये कचऱयातील घातक घटकांचे विघटन होते, अशी माहिती त्यांनी दिली.
होळीमध्ये कृत्रिम रंग वापरले जातात. हे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात. त्या ऐवजी जर आपण राखेसोबत कोरडे नैसर्गिक रंग जसे मेहंदी, हळदी, बिटची पावडर, वाळलेल्या फुलांपासून बनवलेले रंग वापरले तर ते त्वचेचे संरक्षण करतील आणि ते सहजपणे साफही होतात. त्यामुळे पाणी कमी लागेल, शिवाय कोरडे रंग वापरल्याने पाणी बचतही केल्याचेही समाधान मिळेल. अशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनाच्या कामामध्ये सर्वांचे योगदान देता येऊ शकते, असे डॉ. मोघे यांचे म्हणणे आहे.
परिचय…
डॉ. प्रमोद मोघे बेळगावचे सुपूत्र असून पुण्याच्या नॅशनल केमिकलमधून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या नावावर 48 पेटंट्स आहेत. तसेच विश्वगोपरिषद 22 च्या पर्यावरण विभागाचे प्रमुख आहेत. तसेच मृणाल खर्चे या पर्यावरण विभाग संपर्क प्रमुख आहेत.
होळीसाठी देशी गायीच्या गोवऱयांचाच वापर करा
डॉ. मोघे व खर्चे यांच्या मते पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी फक्त दोन गोष्टी कराव्या लागतील. भारतीय वशांच्या देशी गायीच्या शेणापासून बनविलेल्या फक्त पाच गोवऱयांची छोटी होळी करावी व आपल्या घराजवळ जेथे जेथे सार्वजनिक होळी साजरी केली जाते. तेथील संयोजकांना देशी गायीच्या गोवऱयांचाच वापर होळीसाठी करण्यास सांगावे..