ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कालच भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि पुण्यात आज आगीच्या घटना घडल्या आहेत.
मुंबईतील प्रभादेवी भागातील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 15 बंब घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रभादेवीतील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनच्या तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. एडीओ पवार आणि शिर्केसहीत 12 अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी आहे. मात्र या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची सांगितले जात आहे.