अस्मिता मोहिते / सातारा :
केवळ विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हे एक मात्र ध्येय मनाशी बाळगुन शिक्षणक्षेत्राशी गेली 25 ते 26 वर्षे प्राचार्या शीला नंदकुमार वेल्हाळ या कार्यरत आहेत. त्या सातारा शहरातील नामांकित अशा गुरूकुल या शाळेच्या प्राचार्या असून मागील 13 वर्षे त्या अत्त्यंत प्रभावीपणे प्राचार्या हे पद भुषावित आहेत. विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकाशी मर्यादित न ठेवता त्यांच्या इतर उत्तम कलागुणांना वाव देण्याकरीता त्या नेहमी प्रयत्नशील असतात. म्हणूनच तर गुरूकुलचे विद्यार्थी सांस्कृतिक, क्रीडा, नाटय़ आदी विविध विभागात नेहमी अग्रेसर असतात.
प्राचार्या शीला वेल्हाळ यांचे शिक्षण हे साताऱ्यात झाले असून त्यांनी केमेस्ट्री विषयात बी.एस.सी बीएड ही पदवी संपादन केली आहे. त्यांना लहानपणापासुनच शिक्षणाची अत्त्यंत गोडी होती. त्यांचे वडील वसंतराव देवळे हे पोलिस विभागात कार्यरत होते. तर आई वसुमती देवळे या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. त्यांचे आई-वडील दोघे ही उच्च शिक्षित असल्याने त्यांनी लहानपणापासुनच आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा अट्टाहास धरला होता.
घरच्या शिक्षणप्रिय वातावरणामुळे त्यांची तीनही मुले उच्चभुषित झाली. त्यामध्ये त्यांच्या मुलगा रघुवीर देवळे हे सिव्हील इंजिनियर, तर एक मुलगी जयश्री चिंबळकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या, सध्या त्या सेवानिवृत्त आहेत. तसेच शिला यांनी ही एका शिक्षिका पदापासुन प्राचार्य पदापर्यंतची मजल गाठली आहे. त्यांचे पती नंदकुमार वेल्हाळ हे खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राचार्या शीला वेल्हाळ यांचे लग्न झाल्यावर प्रारंभी त्या कोल्हापूर येथे होत्या. जवळपास 12 वर्षे त्यांचे कोल्हापूर येथे निवास असून या दरम्यान ही त्यांनी शिक्षणाप्रति आपली गोडी अशीच टिकुन ठेवली होती. या काळात त्या विद्यार्थ्यांचे टय़ुशन घेत असत. काही वर्षानंतर त्या साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी गुरूकुल या शाळेत आपली सेवा सुरू ठेवली, आजगायत ती कायम आहे.
प्राचार्या शीला यांना दोन मुली असून त्यांना आपल्या दोन्ही मुलींना उच्चभुषीत केले आहे. त्यांची मोठ्ठी मुलगी प्रियांका ही बीई मेकॅनिकल, एम.ई (डिझाईन) तर लहान मुलगी शिवानी हीने बीटेकची पदवी संपादन केली आहे. शाळेबरोबरच त्यांनी आपल्या कुटुंबाकडे ही तितक्याच तप्तरतेने लक्ष होते. त्यांच्या या शिक्षणप्रिय गुणांमुळेच त्यांच्या मुलींनी ही उच्च शिक्षण घेऊन ही मजल गाठली आहे. गुरूकुल शाळेत प्राचार्या हे पद भुषविताना त्यांचे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडे तितकेच लक्ष असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हेरून संबंधित विद्यार्थ्याला त्या त्यांची कला जोपासण्याकरीता प्रेरीत ही करतात. त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षकवर्गांची त्या तितक्याच आपुलकीने वागतात. म्हणूनच गेली 13 वर्षे त्या शाळेच्या प्राचार्या पद अविरतपणे भुषावित आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच ध्यास
विद्यार्थ्यांना शिकविताना मला मनापासुनच खूप आनंद होतो. कारण विद्यार्थ्यांना आपण जे काही शिक्षण देतो त्याचे फलित आपल्याला लगेचच दिसून येते. त्यातच गुरूकुल म्हणजे नुसती ऍकॅडमी नसून आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होता येईल याकडे गुरुकुलकचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकतर लक्ष देतो. शाळेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात गेली तर अव्वलच राहतील यावर अधिक भर दिला जातो. म्हणूनच लॉकडाऊन काळात ही कित्येक पालकांतर्फे शाळा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात असा अट्टाहास धरण्यात येता होता.