प्रतिनिधी/ निपाणी
प्रभू येशूंनी या जगाला शांततेने जगण्याचा संदेश दिला. कितीही संकट आले तरी न घाबरता त्याचा सामना करा, देवाची प्रार्थना केल्याने त्याची फायदे आपणास मिळत असतात. पृथ्वीवरील प्रत्येक जीव देवाचा आशीर्वाद आहे. माणुसकीचा धर्म जोपासत एकजुटीने राहिल्यास देवाचा आशीर्वाद सर्वांनाच मिळू शकतो. प्रभू येशूंनी आपल्या आयुष्यात ज्या वेदना सहन केल्या. जिवघेण्या कृत्यावेळीही येशूंनी आपल्या हल्लेखोरांनाही माफ करत, आपल्यातील सहनशीलतेची व माफ करण्याची शक्ती दाखवून दिली, त्यामुळे त्यांच्या विचारांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन रेव्ह. रविंद्र योसेफ घोलप यांनी केले.
ते येथील ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिसमस दिनी आयोजित जन्मोत्सव कार्याक्रमात बोलत होते. दरम्यान, सुरुवातीला सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर उपकारस्तुतीची प्रार्थना शमुवेल सकट यांनी केली. रमेश सकट यांनी स्त्राsत वाचन केले. रमेश हेगडे, योगेश आवळे, अमित हेगडे, तुषार हेगडे यांनी शास्त्र वाचन केले. रेव्ह. घोलप पुढे म्हणाले, प्रभू येशूंच्या जन्मानंतर मानवांच्या नामाची नोंद सुरु झाली. प्रभूच हे या जगातील सर्वच मानव जातीचे कल्याण करण्यासाठी जन्माला आले होते. त्यांच्या अवतारामुळे पृथ्वीतलावरील पाप कमी होण्यास मदत झाली आहे. नाताळ सणाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करुन समानतेचा संदेश देणारे जगणे जगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दानार्पन दाविद ऐवाळे, समाप्ती प्रार्थना किसन दावणे यांनी केली. कार्यक्रमास अश्विनी सकट, सोनाली आवळे, सुष्मा आवे, रिषिक सकट, विमल आवळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सचिन हेगडे यांनी आभार मानले.