शहाजी पाटील – वार्ताहर
शुक्रवार दि. 23 जुलै सायंकाळी सात वाजता
👉 करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील पूर स्थिती अत्यंत गंभीर बनली आहेत
👉 गुरुवारी दिवसभरात बहुतांशी लोकांनी स्थलांतर केले
👉 दुपारी बारा वाजता स्थलांतरास सुरुवात झाली रात्री दहा वाजेपर्यंत गावातील सुमारे सहा हजार लोकांपैकी 75 टक्के लोकांनी जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर केले मात्र 25 टक्के म्हणजे दीड हजार लोक अद्यापि गावांमध्ये अडकून पडले आहेत तसेच त्यांची जनावरेही पुरामध्ये अडकली आहेत
👉 अवघ्या बारा तासात चिखली जलमय झाल्यामुळे लोकांना वेळेत बाहेर पडता आले नाही
👉 आंबेवाडी येथील तीनशे वर लोक पाण्यामध्ये अडकले आहेत
👉 आज दिवसभरात पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी एन पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून चिखली आंबेवाडी ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी बोटी आल्या मात्र आज दिवसभरात मार्ग शोधत शंभरावर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले
👉 उद्या शनिवारी सकाळपासून बचावकार्य गतिमान होणे आवश्यक आहे अन्यथा दोन्ही गावांमध्ये दुसऱ्या मजल्यावर अडकलेले लोकांना धोका पोहोचू शकतो. अजूनही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने लोकांच्या पर्यंत पोहोचलेली नाही. अद्याप लोक सुरक्षित आहेत मात्र शनिवारी सकाळपासून बचावकार्य पूर्ण क्षमतेने राबवणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा जीवित हानी होऊ शकते.
👉 प्रयाग चिखली येथील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे गावातील एकही ठिकाण पाण्याशिवाय नाही
👉 तीनशेवर जनावरे सध्या पाण्यामध्ये अर्धीअधिक बुडलेले आहेत
👉 ग्रामस्थ आप-आपल्या घरामध्ये दुसऱ्या माळ्यावर अडकलेले आहेत
👉 अडकलेल्या ग्रामस्थांचा शुक्रवारचा दिवस फक्त प्रशासनाच्या मदतीची वाट पाहण्यात गेला
👉 सोनतळी येथील आश्रम शाळेमध्ये पूरग्रस्तांना तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली असून याठिकाणी अध्यापक साहित्याची कमतरता आहे याठिकाणी मदतीची गरज आहे
👉 सोनतळी ठिकाणी असलेल्या जनावरांच्या छावणी साठी चाऱ्याची आवश्यकता आहे
👉 पाणी वाढत असल्यामुळे ग्रामस्थांना शुक्रवार ची रात्र काळ रात्र वाटू लागली आहे