खासदार मंगला अंगडी यांची सूचना : जिल्हा पंचायत सभागृहात त्रैमासिक विकास आढावा बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता घ्या. सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत काटेकोरपणे पोहोचायला हव्यात. त्याशिवाय प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करा, अशा सूचना खासदार मंगला अंगडी यांनी केली. सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात त्रैमासिक विकास आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी खासदार आण्णासाहेब जोल्ले होते.
जिल्हय़ात कोणतीही विकासकामे अपूर्ण राहिल्यास मार्चपूर्वी ती पूर्ण करावीत. सरकारने मंजूर केलेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यात यावा. या दरम्यान विशेषतः पिण्याच्या पाण्याचे टँक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जावा, असे खासदार अंगडी
म्हणाल्या.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ जिल्हय़ातील सर्व नागरिकांना मिळावा, यादृष्टीने शासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेतून 930 कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. केंद्राकडून 392 तर राज्य सरकारकडून 396.50 कोटी अनुदान देण्यात आले असताना 647.53 कोटी निधी खर्च करण्यात आल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त रुदेश घाळी यांनी दिली. स्मार्ट सिटी योजनेतून 104 कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात 213.31 कोटींची 46 कामे पूर्ण झाली आहेत. 715.57 कोटींची 57 कामे प्रगतिपथावर आहेत, तर 1.12 कोटींच्या एका कामाची निविदा काढणे अद्याप बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
चिकोडी तालुक्यातील शाळांची कामे अपूर्ण
सर्व शिक्षण अभियानातून चिकोडी तालुक्मयातील अनेक शाळांची कामे अपूर्ण आहेत. ती तात्काळ पूर्ण करावीत. बेळगाव, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्मयातील बहुतेक शाळांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. त्यातील 2 शाळांची कामे अपूर्ण आहेत तर नव्या 10 शाळा खोल्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती शिक्षणाधिकाऱयांनी दिली. बैलहोंगल आणि खानापूर तालुक्मयातील एकाही शाळेचे काम अपूर्ण राहू नये, अशी सक्त सूचना इराण्णा कडाडी यांनी केली.
रोहयोतून तलाव, डिजिटल ग्रंथालय, ग्रा. पं. नवे कार्यालय, प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी मैदान, वर्गखोल्या, स्वयंपाक खोल्या निर्मितीची योजना आखण्यात आल्याची माहिती जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. यांनी दिली.
बेळगाव प्रथम क्रमांकावर!
महिला आणि बालकल्याण खात्याकडून प्रत्येक बालकाला आणि गर्भवती महिलेला अंडी व विविध पौष्टिक आहाराचा पुरवठा केला जातो. यामध्ये राज्यात बेळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती यावेळी खात्याचे संचालक बसवराज मरवट्टी यांनी दिली.