बसेसची संख्या कमी असल्याने समस्या
बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बंद पडलेला व्यवसाय, उद्योगधंदे, बाजारपेठा, परिवहन विभाग, शाळा-महाविद्यालये यासह अनेक गोष्टी सुरू झाल्या. आता सर्व काही सुरळीत चालू असल्याने नागरिकांची वर्दळ सर्वत्र दिसून येत आहे. प्रवास करणाऱया नागरिकांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. मात्र, कमी बसेसच्या संख्येमुळे प्रवाशांना बसमधून लोंबकळत जाण्याची वेळ आली असून एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. लॉकडाऊननंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शाळा-महाविद्यालये गजबजू लागल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना आणि नोकरदारवर्गाला मिळेल त्या बसने जावे लागत आहे. मात्र बसमध्ये प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने काही प्रवाशांना लोंबकळत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एखादा अपघात होऊन दुर्दैवी घटना घडण्याची शक्मयता वाढली आहे. यामुळे परिवहन विभागाने एखादी दुर्दैवी घटना घडण्याआधी सकाळच्या सत्रात जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे.