सोबत काम करण्याची इच्छा नसल्याचे पीकेनी कळविले
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार यादीवरून राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये शनिवारी निदर्शने झाली होती. राज्याच्या 108 नगरपालिकांसाठी उमेदवारांच्या निवडीप्रकरणी असंतुष्ट कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. उमेदवार यादी आणि निदर्शनांवरून प्रशांत किशोर यांची संघटना आय-पॅकवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्यातच वाद झाल्याची बाब समोर आली आहे.
तृणमूल काँग्रेस आता आय-पॅकसोबतचे स्वतःचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या यादीवरून व्यापक विरोधादरम्यान आय-पॅकला दूर सारण्याची भूमिका घेतल्याचे समजते.
प्रशांत किशोरांचा मेसेज
आय-पॅक पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालयात तृणमूल काँग्रेससोबत काम करू इच्छित नसल्याचे प्रशांत किशोर यांनी दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांना टेक्स्ट मेसेजद्वारे कळविले होते. याच्या उत्तरादाखल ममतांनी केवळ ‘थँक यू’ असा संदेश पाठविला होता. बंगालमध्ये तृणमूलचे नेते, कार्यकर्ते, राज्यातील मंत्री देखील शासकीय विभागांमध्ये आय-पॅकच्या हस्तक्षेपामुळे नाराज होते अशी चर्चा आहे.
राज्यभरात निदर्शने
विरोधादरम्यान राज्याचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते फिरहाद हकीम यांनी हा पक्षाचा अंतर्गत विषय असून सर्व मतभेद लवकरच सोडविले जातील असे म्हटले आहे. उत्तर 24 परगणा जिल्हय़ात तृणमूल कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरली आहे. पूर्व मेदिनीपूर जिल्हय़ाच्या एगरा नगरपालिकेप्रकरणी तृणमूल कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री अखिल गिरी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली आहेत. अशाचप्रकारे निदर्शने राज्यातील अन्य जिल्हय़ांमध्ये झाली आहेत.
आय-पॅकने अंग झटकले
पक्षनेतृत्वाच्या एका गटाने या निदर्शनांसाठी तृणमूल काँग्रेसचे सल्लागार प्रशांत किशोर यांना जबाबदार ठरविले होते. स्थानिक निवडणुकीच्या उमेदवारांच्या निवडीत आपली कुठलीच भूमिका नव्हती असे आय-पॅकचे म्हणणे आहे. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे कमरहाटीचे आमदार मदन मित्रा यांनी सांगितले आहे.
भाजपकडून आरोप तृणमूलची कुठलीच विचारसरणी नसून त्याच्या सदस्यांमध्ये एकता नाही. तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षामध्ये ही लूट करण्याची लढाई असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष