प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी करण्यात आलेली असताना देखील केवळ मुंबईत मृत पावलेल्या घरातील महिलेचा मृतदेह घेवून मुळचे सातार्यातीलच पण मुंबईत स्थायिक असलेले कुटुंब सातार्यात दाखल झाले. वास्तविक या वातावरणात त्यांनी मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याची गरज असताना ते प्रतापगंज पेठेत दाखल झाले आणि त्यांच्या पाठोपाठ कोरोनाने सातारा शहरात प्रवेश केला. हे कुटुंब मृतदेह घेवून आले. माहुलीत अंत्यसंस्कार केल्यानंतर ते पेठेसह शहरात फिरत होते. पेठेतील लोकांनी तक्रार करुन देखील या कुटुंबातील सदस्यांची तपासणी झाली नाही वा कोणी दखलही घेतली नसल्याचा गंभीर प्रकार समोर येत असून एकीकडे प्रशासन रुग्ण वा बाहेरुन आलेल्यांची माहिती दडवू नका असे आवाहन करत असताना दुसरीकडे हा प्रतापगंज पॅटर्न दुर्लक्षित का ठेवण्यात आला याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर जिल्हा कारागृहात लॉकडाऊनच्या काळात येरवडय़ाचा जादा भार आणून टाकला अन दुर्देवाने तो देखील कोरोनाग्रस्त निघाल्याने कोरोना अधिकृतपणे परवानगीसह शिरकाव केल्यासारखेचा आहे.
22 मार्चपासून सातारा शहरात लॉकडाऊन सुरु आहे. तो सातारकरांना समजवण्यात पोलिसांचा बराच वेळ गेला. नंतर 90 टक्के सातारकर लॉकडाऊन यशस्वीपणे पाळत होते. त्यामुळे सातारकरांमध्ये कोरोनाग्रस्त कोणीही नाही. उलट जिल्हा रुग्णालयातच दक्षता घेण्याची गरज असताना एक महिला कर्मचारी बाधित झालीय तर कराड उपजिल्हा रुग्णालयात काम करणारी पणा सातार्यातून येजा करणारी नर्सही बाधित झालीय. या दोघीं पॉझिटिव्ह समोर आल्यानंतर लगेचच प्रतापगंज पेठेतील मुंबईहून येवून तिथे रहात असलेला युवक पॉझिटिव्ह आढळून आला असून त्याचे सर्व कुटुंब हायरिस्कमध्ये असल्याने आता त्यांच्या रिपोर्टकडे सर्वांचे डेळे लागले आहेत. सातारा शहरात लॉकडाऊन पाळत असलेले कोणीही बाधित नाहीत पण आता शहरात पॉझेटिव्ह आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रतापगंज पेठेतील कहाणी दि. 17 एप्रिलपासून सुरु झाली. 16 रोजी रात्री या कुटुंबातील सहाजण मुंबईतून त्यांच्या कुटुंबातील महिलेची डेडबॉडी घेवून रुग्णवाहिकेतून निघाली. रुग्णवाहिका असल्याने जिल्हाबंदीत देखील त्यांना बहुदा कोणी अडवले नाही. दि. 17 रोजी पहाटे हे कुटुंब मृत महिलेला घेवून त्यांच्या प्रतापगंज पेठेतील घरी पोहोचले. ही मंडळी मुंबईहून आली असल्याने पेठेतील बहुदा कोणीही त्यांना सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नव्हते. या कुटुबातील एकच व्यक्ती पेठेतील घरात रहाते व बाकी सर्व तसे मुंबईवासीच आहेत. त्यामुळे पेठेतील मंडळी तशी फटकूनच राहिली. शेवटी या कुटुंबाने तातडीने मृतदेह अंत्यविधीस नेणे आवश्यक असले तरी तिथ मृतदेहाला अंघोळ घातली व नंतर रुग्णवाहिकेतून दहनासाठी नेले. यावेळी त्याच्या समवेत एक कल्याण पासिंगची कार अन्य व्यक्ती आल्या होत्या.
एकतर मुंबईत कोरोनाचा कहर सुरु असताना या कुटुंबाने सातार्यात यायलाच नको होते. मात्र ते आले. त्यांनी अंत्यसंस्कारही उरकले. हे कुटुंब क्वारंटाईन करावे अशी नागरिकांची इच्छा होती. याबाबत पेठेतील सामाजिक कार्यकर्ते महेश गोंदकर यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी 1077 ला फोन करुन ही माहिती दिली मात्र या क्रमांकावर कळवून देखील पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही येवून गेले त्यांनी देखील माहिती मिळून देखील कार्यवाही केली नाही. उलट महेश गोंदकर यांना उलट प्रश्न करण्यात आले असल्याची त्यांची तक्रार आहे. दि. 17 एप्रिल पासून आलेले हे मुंबईकर कुटुंब व त्यांचे सदस्य बिनधास्तपणे फिरत होते आणि प्रशासनाला माहिती कळवून देखील प्रशासन ढिम्म होते त्याचा परिणाम म्हणजे शहरात कोरोनाचा झालेला शिरकाव.
रुग्णवाहिकेचा चालक धारावीचा
जी रुग्णवाहिका मृत महिलेसह नातेवाईकांना घेवून आली होती. त्या रुग्णवाहिकेचा चालक धारावीचा होता. तो इतरत्र बाहेर फिरताना त्यालाही गोंदकर यांनी हटकले होते. प्रतापगंज पेठेतील नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत होती. संबंधित कुटुब मुंबईतून आलेले असल्याने व प्रशासनाला कळवून देखील त्यांना क्वारंटाईन करण्यात आले नसल्याने त्यांच्यापासून लांबच होते. तोपर्यंत मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. प्रतापगंज पेठेत आलेले हे मुंबईकर कुटुंबिय स्वतची सुटका झाल्यासारखे वागत होते. मात्र नागरिकांची भीती खरी ठरली आणि त्या कुटुबांतील एका युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता तरी प्रशासन अर्लट होणार की नाही. मुंबईवरुन जिल्हाबंदी तोडून आलेल्या अनेकांना तपासणीसाठी क्वारंटाईन करण्याची गरज आहे.
सीमा नावापुरत्या सील आहेत
कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर जिल्हाबंदी करुन सीमा सील केल्या असल्या व तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी सातारा शहरासह जिल्हयात मुंबई व पुणेकर येतच होते. येणार्यांचा गनिमा कावा पोलिसांना समजत नव्हता की काय असा सवाल निर्माण होत आहे. कल्याण पासिंगची कारही प्रतापगंज पेठेतील कुटुंबियांच्या रुग्णवाहिकेबरोबर आली आहे. या कारला जिल्हय़ात प्रवेश कसा दिला आहे, असा नागरिकांचा सवाल आहे. जिल्हाबंदी ही कडक करण्यासाठी स्वत गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी कडक सूचना दिल्या होत्या. मात्र सीमा नावापुरत्याच सील होत्या व मुंबई व पुण्याहून लोक जिल्हय़ात घुसत होते आता त्या लोकांचेच आव्हान प्रशासनासमोर निश्चितपणे आहे.
जिल्हा कारागृहात उडाली खळबळ प्रतापगंज पेठेतील कोरोनाग्रस्ताने खळबळ उडाली असतानाच जिल्हा कारागृहात पुण्यातील येरवडामध्ये भार होत असलेले दोन कैदी सातार्याला पाहुणे म्हणून लॉकडा ऊनच्या काळात अधिकृतपणे आणले आणि ते दोन कैदीही कोरोनाबाधित निघाले. सातारा शहर व तालुका ग्रीन झोनकडे वाटचाल करत असताना बाहेरुनच आलेल्यांनी वाट लावायचीच आहे असे ठरवून केल्यागत हा प्रकार आहे. एकीकडे पोलीस सामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरताना फटकेबाजी करत होते तर दुसरीकडे पुण्यातील ब्याद कायदेशीरपणे सातार्यात आणून कोरोना रुग्ण संख्येत भर टाकली गेली आहे. या प्रकाराने कारागृहात खळबळ उडाली असून बाधितांच्या सहवासात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर कारागृहाचा परिसर सील करण्यात आला आहे. कारागृह व प्रतापगंज पेठ हे दोन प्रकार म्हणजे सातारकरांना मोती चौकात जायचे असेल तर पार्श्वभागावर फटके आणि जिल्हय़ाच्या सीमा सीलबंद असताना पुण्या, मुंबईवरुन येणार्यांचे हार्दिक स्वागत असा