प्रतिनिधी /वाळपई
जनता व प्रशासन यांच्यामधील असलेला दुवा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रशासन “गाव की और “या उपक्रमाला सत्तरी तालुक्मयातील जनतेने थंडा प्रतिसाद दिला. त्यामुळे हा प्रयोग फसल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या संदर्भात जनजागृती व्यवस्थितपणे न झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील नागरिक सदर उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.
याबाबतची माहिती अशी की प्रशासन गाव की और यातर्गत सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एक विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये सत्तरी तालुक्मयातील जवळपास बावीस वेगवेगळय़ा खात्यांच्या अधिकाऱयांनी वेगवेगळय़ा काउंटर लावून सहभाग दर्शविला होता. नागरिकांची कामे त्वरित हातावेगळी करून प्रशासनाचा चांगला प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या उपक्रमाची व्यवस्थित प्रसिद्ध होऊ शकले नाही. यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होता आले नाही. फक्त सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा पंचायतीचे सरपंच उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते .पारंपरिक समई प्रज्वलित करून उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्या हस्ते या उपक्रमाचे सुरुवात करण्यात आली .
याप्रसंगी सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार कौशिक देसाई संयुक्त मामलेदार साईश नाईक सत्तरी तालुक्मयाचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे वाळपई वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंता दीपक गावस ठाणे पंचायतीचे सरपंच निलेश परवार नगरगाव पंचायतीचे सरपंच प्रशांत मराठे माउस पंचायतीच्या सरपंचा वंदना गावस यांची खास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रवीण परब यांनी सांगितले की सर्वसामान्य जनता व सरकारी अधिकारी यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने हा विशिष्ट कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची असलेली कामे वेगवेगळय़ा खात्यात त्वरित हातावेगळी व्हावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कायद्याला अनुसरून रिकामे त्वरित हातावेग.ळी करण्यात येतील असे आश्वासन यावेळी त्यांनी उद्घाटन समारंभात बोलताना दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रवीण परब यांनी सांगितले की याविषयीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनता व सरकारी अधिकारी यांच्यामध्ये एक नवा दुवा निर्माण होणार आहे व येणाऱया काळात याचा चांगल्या प्रकारे फायदा सर्वसमान्य जनतेबरोबर सरकारलाही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान उपक्रमाच्या जनजागृतीच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की एका बाजूने निवडणुकीचे काम व दुसऱया बाजूने हा उपक्रम यामुळे या संदर्भातील व्यवस्थित जनजागृती होऊ शकली नाही .तरीसुद्धा वेगवेगळय़ा पंचायतीच्या माध्यमातून व अंगणवाडी शाळांच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार कौशिक देसाई यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयातील 22 सरकारी कार्यालये यामध्ये सहभागी झालेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची अडलेली कामे याठिकाणी हातावेगळी होतील अशी अशा या विधान व्यक्त केली.
दरम्यान या उपक्रमाची व्यवस्थित प्रसिद्धी व जनजागृती न झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयाचे जनतेने या उपक्रमांमध्ये पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले .आपली दैनंदिन कामे घेऊन येणाऱया नागरिकांनी या ठिकाणी येऊन काही प्रमाणात कामे हातावेगळी करून घेण्यासाठी संदर्भात प्रतिसाद दिला .मात्र या उपक्रमाच्माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील जनतेने मोठय़ा प्रमाणात यामध्ये सहभागी होण्याची गरज होती. मात्र या सदर्भात जनजागृती न झाल्यामुळे प्रशासन गाव की और हा प्रयोग सध्यातरी फसल्यातच जमा आहे.