ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. काल रात्री 21 मार्च रोजी त्यांचे निधन झाले.
तब्येत बिघडल्यानंतर सागर यांना कार्डिएक केअर रुग्णालयाच्या आईसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा आजार होता. 2018 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सागर सरहदी यांचा जन्म 11 मे 1933 मध्ये पाकिस्तानामध्ये झाला होता. त्यानंतर ते दिल्लीत आले. दिल्लीत काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर संघर्ष करत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले.
यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटामुळे सागर सरहदी यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली होती. तसेच त्यांनी अनेक गाजेलल्या चित्रपटासांठी संहिता लेखन केले आहे. यात नुरी, सिलसिला (1981), चांदनी (1989), रंग (1993), दिवाना, जिंदगी, कर्मयोगी, कहो ना प्यार है, कारोबार, बाजार आणि चौसर सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.